शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

संधी दिली तर मुख्यमंत्रीही बनेन - राजदीप सरदेसाई

By admin | Updated: May 25, 2016 02:13 IST

गोमंतकीयांनी गोव्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली तर मी निश्चित मुख्यमंत्री बनेन; परंतु तशी संधी गोमंतकीय निश्चित देणार नाहीत याची मला खात्री आहे. तूर्तास मला पत्रकार म्हणूनच

पणजी : गोमंतकीयांनी गोव्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली तर मी निश्चित मुख्यमंत्री बनेन; परंतु तशी संधी गोमंतकीय निश्चित देणार नाहीत याची मला खात्री आहे. तूर्तास मला पत्रकार म्हणूनच राहायचे आहे, असे सांगत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत गोवन आॅफ द इयर पुरस्कार विजेते राजदीप सरदेसाई यांनी गोव्यात त्यांच्या राजकारण प्रवेशाविषयी चाललेल्या चर्चेला पूणर्विराम दिला. पुरस्कार वितरण सोहळ््यादरम्यान लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. सार्वजनिक पद भूषवायचे झाल्यास आपल्याला ते गोव्यात येऊनच भूषवायला आवडेल. परंतु पत्रकार हा राजकारणात प्रवेश करतो तेव्हा तो पत्रकार म्हणून थांबतो. आपल्याला पत्रकार म्हणून एवढ्यात थांबायचे नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.पत्रकारिता तटस्थ असावी की एक भूमिका घेऊन पत्रकारांनी पुढे जावे याविषयी जी चर्चा होत आहे, त्याविषयी बोलताना पत्रकारांनी आपली तटस्थता कदापी सोडू नये असे सांगत पत्रकाराने न्यायाधीशाची भूमिका घ्यायची नसते असे मत त्यांनी नोंदवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले संबंध चांगले असले तरी अधूनमधून त्यात कटूत्वही पाझरल्याचे ते म्हणाले. तसे त्यांच्याशी आपले पूर्वीपासून चांगले संबंध होते. २००२च्या गुजरात दंगलीनंतर त्यात कटुता आली. मोदी हे कर्मयोगी आहेत, ते नेहमी कामात व्यस्त असतात. आपणत्यांना रिलॅक्स मूडमध्ये कधीचपाहिले नाही. ते कौटुंबिक जीवनात गुंतून न राहिल्यामुळे कदाचित भावनाविवश होत नसावेत, असे सरदेसाई म्हणाले. पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे अवलोकन करता कॉँग्रेसला भवितव्य आहे काय, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हा प्रश्नप्रत्येक दहा वर्षांनी चर्चिला जात असल्याचे सांगितले. कॉँग्रेस संपणार नाही; परंतु पक्षापुढे समस्या मात्र निश्चित आहेत. घराणेशाहीची सद्दी फार काळ चालणार नाही आणि राहुल गांधी यांनी राजकीय मत आपल्याला अनुकुल करून घेण्यासाठी फारशी मेहनत घेतलेली नाही. एकेकाळचे कॉँग्रेसवालेच वेगळा गट करून कॉँग्रेसला शह देत आहेत. तृणमूल कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस हे मूळ कॉँग्रेसचेच आहेत. प्रादेशिक पक्ष पर्याय देऊ लागले आहेत ही वाईट गोष्ट नव्हे . लोकांच्या समस्या घेऊन हे पक्ष जर पुढे येत आहेत तर ते निश्चितच चांगला पर्याय ठरू शकतात. केवळ दिल्लीच्या राजकारणाची मक्तेदारी यापुढे चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरदेसाई यांच्या या उत्तरावर टिप्पणी करताना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी राजकारणात घराणेशाही असली तरीही प्रत्येकाला प्रत्येक पाच वर्षांतून आपली कार्यक्षमता ही सिद्ध करावीच लागते आणि त्यासाठीजबाबदारी घेऊन काम हे करावेच लागते हे त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच स्वत: सरदेसाई यांना राजकारणात उतरण्याचे आवाहनही केले. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी तोलामोलाच्या साधनसुविधा विकसित करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)