शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:12 IST

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा ...

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा यांना उद्देशून केले आहे. ट्विटमध्ये खा. सिन्हा म्हणतात की, ‘वन मॅन शो व टू मॅन आर्मी’ला माझी विनंती आहे की, प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी विधाने व आश्वासने संपली असतील तर कृपया दिल्लीला परत यावे. सर्व केंद्रीय मंत्री व गुजरातमध्ये इतके दिवस बसलेल्या केंद्र सरकारनेही आता परतायला हवे.टाळी कर्णधाराला...आपण विजयी झालो तर याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल, हे आम्हाला माहीत आहे; पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करून सिन्हा यांनी ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’ या म्हणीचा उल्लेखही केला आहे. गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला तशी अपेक्षाही आहे, असेही खासदार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017