शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दिरंगाईने निर्णय घेतले असते, तर देश संकटात सापडला असता -गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:20 IST

 कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतले नसते, तर देश फार मोठ्या संकटात सापडला असता, असे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

अदानी म्हणाले की, सर्वात मोठा उत्पादक तसेच सेवा पुरविणारा देश बनविण्यासाठी चालून आलेली योग्य संधी केंद्र सरकारने साधली. कोणत्याही संकल्पना या शंभर (पान ७ वर)टक्के बरोबर किंवा चूक नसतात. कोरोना साथीसारख्या अकस्मात उद्भवलेल्या संकटकाळात हाती उपलब्ध असलेल्या योग्य माहितीच्या आधारे कोणत्याही सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित असते, तसेच सतत मिळत राहणाऱ्या नव्या माहितीचे विश्लेषण करून आपल्या धोरणातही त्या सरकारने बदल केले पाहिजेत. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार व प्रशासनाने अशा पद्धतीनेच काम केले असून, ते अभिनंदनास पात्र आहेत.

अदानी उद्योगसमूहाच्या वार्षिक अहवालात चेअरमन या नात्याने गौतम अदानी यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आपल्यापेक्षा अधिक संपन्न असलेल्या देशांची कोरोनाशी लढताना दमछाक झाली आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यास केंद्र सरकारने वेळ दवडला असता, तर आपला देश मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता होती. त्याचा केवळ भारतावरच नव्हे, तर जगावरही परिणाम झाला असता. कोरोनाच्या साथीचा उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. मोठी जीवितहानी झाली आहे. असंख्य लोक बेकार झाले आहेत. स्थलांतरित मजुरांचे हाल अवघ्या देशाने पाहिले; पण केंद्र सरकारने योग्य वेळी हालचाली केल्या नसत्या, तर यापेक्षाही भयंकर गोष्टींना देशाला सामोरे जावे लागले असते.

सर्वांनीच बजावली उत्तम कामगिरीउद्योगपती गौतम अदानी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करताना राजकीय नेते, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, लष्कर, फेरीवाले, नागरिकांनी आपापल्या परीने योग्य कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आपण कोरोनाशी उत्तम प्रकारे लढा देत आहोत. जनधन योजना, आधार, मोबाईल लिंकिंग या गोष्टींद्वारे केंद्र सरकारच्या योजनांचे जनतेला थेट फायदे मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी