शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

दिरंगाईने निर्णय घेतले असते, तर देश संकटात सापडला असता -गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:20 IST

 कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतले नसते, तर देश फार मोठ्या संकटात सापडला असता, असे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

अदानी म्हणाले की, सर्वात मोठा उत्पादक तसेच सेवा पुरविणारा देश बनविण्यासाठी चालून आलेली योग्य संधी केंद्र सरकारने साधली. कोणत्याही संकल्पना या शंभर (पान ७ वर)टक्के बरोबर किंवा चूक नसतात. कोरोना साथीसारख्या अकस्मात उद्भवलेल्या संकटकाळात हाती उपलब्ध असलेल्या योग्य माहितीच्या आधारे कोणत्याही सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित असते, तसेच सतत मिळत राहणाऱ्या नव्या माहितीचे विश्लेषण करून आपल्या धोरणातही त्या सरकारने बदल केले पाहिजेत. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार व प्रशासनाने अशा पद्धतीनेच काम केले असून, ते अभिनंदनास पात्र आहेत.

अदानी उद्योगसमूहाच्या वार्षिक अहवालात चेअरमन या नात्याने गौतम अदानी यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आपल्यापेक्षा अधिक संपन्न असलेल्या देशांची कोरोनाशी लढताना दमछाक झाली आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यास केंद्र सरकारने वेळ दवडला असता, तर आपला देश मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता होती. त्याचा केवळ भारतावरच नव्हे, तर जगावरही परिणाम झाला असता. कोरोनाच्या साथीचा उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. मोठी जीवितहानी झाली आहे. असंख्य लोक बेकार झाले आहेत. स्थलांतरित मजुरांचे हाल अवघ्या देशाने पाहिले; पण केंद्र सरकारने योग्य वेळी हालचाली केल्या नसत्या, तर यापेक्षाही भयंकर गोष्टींना देशाला सामोरे जावे लागले असते.

सर्वांनीच बजावली उत्तम कामगिरीउद्योगपती गौतम अदानी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करताना राजकीय नेते, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, लष्कर, फेरीवाले, नागरिकांनी आपापल्या परीने योग्य कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आपण कोरोनाशी उत्तम प्रकारे लढा देत आहोत. जनधन योजना, आधार, मोबाईल लिंकिंग या गोष्टींद्वारे केंद्र सरकारच्या योजनांचे जनतेला थेट फायदे मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी