शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...तर देश अतिरेक्यांच्या तावडीत

By admin | Updated: January 7, 2016 10:25 IST

पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ला म्हणजे भारतासाठी गंभीर इशारा असून अशीच परिस्थिती राहिली तर देश दहशतवाद्यांच्या तावडीत जाऊ शकतो

नवी दिल्ली : पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ला म्हणजे भारतासाठी गंभीर इशारा असून अशीच परिस्थिती राहिली तर देश दहशतवाद्यांच्या तावडीत जाऊ शकतो, अशी भीती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना दहशतवादी हल्ले रोखण्याकरिता केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चुकीची जबाबदारी निश्चित करावी आणि जबाबदार व्यक्तीने राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानबद्दल काय बोलले होते. मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी कुठले वक्तव्य केले होते आणि आजही त्यांची हीच भूमिका कायम आहे काय? आणि नसेल तर या बदलामागील कारण काय? हे मोदींनी स्पष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)व्हिडिओ क्लिप दाखविलीनिवडणूक प्रचार काळात मोदी पाकबद्दल काय काय बोलत होते आणि आता मात्र कसे मौन पाळून आहेत हे दर्शविणारी एक व्हिडिओ क्लीपही काँग्रेसने यावेळी दाखविली. पठाणकोटमध्ये गोळीबार सुरू होता त्यावेळी मोदी योगाभ्यासावर भाषण देत होते.३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यानच्या रात्री ३ वाजून ३४ मिनिटांनी दहशतवादी घुसले असल्याची गोपनीय सूचना मिळाली होती. मग कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलापंतप्रधान, सरकारमधील मंत्री गप्प का? पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांना साऱ्या सूचना पाकिस्तानातून मिळत होत्या. दहशतवाद्यांकडील शस्त्रे, वस्त्रे, स्फोटके, साधनसामुग्री इतकेच नव्हे तर पादत्राणेही पाकिस्तानी असल्याची खात्री पटली आहे. ही माहिती खरी असेल, तर पंतप्रधान व त्यांच्या सरकारचे मंत्री गप्प का आहेत? दहशतवादी पाकिस्तानी होते असा स्पष्ट उल्लेख करण्यास ते का घाबरत आहेत? दिल्लीत पाक उच्चायुक्ताला बोलावून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सदर प्रकरण सरकारने उपस्थित का केले नाही? मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक घेउन पठाणकोट आॅपरेशनच्या नियंत्रणाची सारी सूत्रे पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी आपल्या हाती का घेतली नाहीत, असे रोखटोक सवाल शिंदे यांनी केले.