शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जात खोटी ठरल्यास नोकरी, प्रवेश लगेच रद्द

By admin | Updated: July 7, 2017 04:56 IST

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा दाखला पडताळणीमध्ये खोटा ठरल्यास अशा दाखल्याच्या जोरावर मिळविलेली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा दाखला पडताळणीमध्ये खोटा ठरल्यास अशा दाखल्याच्या जोरावर मिळविलेली सरकारी नोकरी किंवा शैक्षणिक संस्थेत मिळविलेला प्रवेश तत्काळ रद्दबातल होतो आणि अशा व्यक्तींचा त्या आरक्षणाचा लाभ कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.अशा प्रकरणांमध्ये बराच काळ उलटला या किंवा मानवतावादी कारणांवरून न्यायालयेही राखीव प्रवर्गात नसलेल्या अशा व्यक्तींच्या नोकऱ्या किंवा प्रवेश अबाधित ठेवण्याचे आदेश देऊ शकत नाहीत. परिणामी अशा लोकांना संरक्षण देणारे ‘शासन निर्णय’ राज्य सरकारने काढले असतील तर तेही बेकायदा व घटनाबाह्य ठरतात, असेही न्यायालयाने ठामपणे नमूद केले. महाराष्ट्रातून दाखल झालेल्या एकूण २२ प्रकरणांमध्ये सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार, न्या. एन. व्ही. रमणा व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा सामायिक निकाल दिला. खंडपीठाच्या वतीने हे ९३ पानी निकालपत्र न्या. डॉ. चंद्रचूड यांनी लिहिले. ही सर्व प्रकरणे प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालांविरुद्धची अपिले होती. यापैकी काही अपिले जातीचा दाखला खोटा ठरल्याने ज्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले त्यांनी केली होती तर काही राज्य सरकारने केलेली होती.न्यायालयाने म्हटले की, माधुरी पाटील प्रकरणातील निकालानंतर महाराष्ट्र सरकारने जातीच्या दाखल्यांची पडताळणी व अनुषंगिक बाबींसंबंधी सन २००१ मध्ये एक कायदा केला. त्या कायद्याच्या कलम १० मध्ये जातीचा दाखला पडताळणीनंतर रद्द झाल्यास त्याआधारे मिळालेले सर्व लाभ काढून घेण्याची तरतूद आहे. कलम ११ मध्ये अशा फसवणुकीबद्दल खटला भरण्याची तरतूद आहे. यातील कलम ११ मधील खटला दाखल करण्याची तरतूद ही पश्चातलक्षी असली तरी कलम १० मधील तरतूद मात्र तशी नाही. म्हणजेच पडताळणीनंतर बनावट ठरून रद्द झालेला दाखला हा कायदा होण्यापूर्वी घेतलेला असला तरी त्या दाखल्याने मिळालेले लाभ कायम ठेवले जाऊ शकत नाहीत.न्यायालय म्हणते की, मागासवर्गीयांना आरक्षण ही राज्यघटनेतील तरतूद आहे. त्याचा लाभ मागासांखेरीज इतरांनी खोटेपणा करून लुबाडणे ही राज्यघटनेची प्रतारणा आहे. न्यायालये राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी असल्याने ती अशा लुबाडणुकीस बळ मिळेल, असे कोणतेही आदेश देऊ शकत नाही. विशेषत: जेव्हा विधिमंडळाने सुस्पष्ट कायदा केलेला असतो, तेव्हा न्यायालये त्या कायद्याच्या विपरित असे कोणतेही आदेश देऊ शकत नाहीत.ते निकाल चुकीचेमध्यंतरीच्या काळात उच्च न्यायालयाने व काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही संबंधित व्यक्तीकडून, मी किंवा माझी मुलेबाळे या जातीच्या नावाने कोणतेही लाभ घेणार नाही, असे अभिवचन लिहून घेऊन, जातीचा दाखला रद्द होऊनही त्यांच्या नोकऱ्या किंवा प्रवेश अबाधित ठेवण्याचे निकाल दिले होते. ते निकालही चुकीचे आहेत, असे आता या खंडपीठाने नमूद केले.