शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सत्तेसाठी सर्वांची वैचारिक तिलांजली

By admin | Updated: September 26, 2014 08:36 IST

स्वार्थ हा माणसाला आंधळे करतो आणि राजकीय स्वार्थ बेधुंद..! त्याचेच जागते उदाहरण आज महाराष्ट्राला पाहावयास मिळाले

दिनकर रायकर, मुंबई स्वार्थ हा माणसाला आंधळे करतो आणि राजकीय स्वार्थ बेधुंद..! त्याचेच जागते उदाहरण आज महाराष्ट्राला पाहावयास मिळाले. केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच असावे या हट्टापोटी शिवसेनेने २५ वर्षांचा घरोबा मोडला. सत्तेचा सोपान अवघ्या काही पावलांवर आलेला दिसत असताना त्यांना हे ‘शहाणपण’ सुचले आणि त्यांनी स्वत:च्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतला. परिणामी महायुतीतून शिवसेनेने स्वत:लाच हद्दपार करून घेतले आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढू नयेत यासाठी पडद्याआड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली खेळीदेखील यानिमित्ताने यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल हा साधा न्यायपूर्ण मार्ग जर शिवसेनेने स्वीकारला असता तर आज महायुतीच्या उमेदवारांना फारसा प्रचारही न करता सत्ता काबीज करता आली असती. युतीच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना हा मोठा व भाजपा लहान भाऊ असे अलिखित ठरले होते. त्याचा फायदा शिवसेनेला झाला आणि १९९५ साली मुख्यमंत्रिपदही त्यांना मिळाले होते. राजकारण हे कायम दोन अधिक दोन चार अशा सरळ गणिताने चालत नाही. त्याचे कधी पाचही होतात तर कधी तीनही करावे लागतात. हे राजकीय कटू सत्य न मानता शिवसेना आपल्याच हेक्यावर कायम राहिली आणि बाळासाहेब ठाकरे-प्रमोद महाजन यांनी अनेक वर्षे देवाणघेवाण करत टिकवलेल्या संसाराचे संचित त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. हे खरे की शिवसेना ही महाराष्ट्रात तळागाळात पोहोचलेली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपाची राज्यात ताकद वाढवली. याच मोदी लाटेचा फायदा शिवसेनेलाही झाला. त्याच ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणे त्यांना शक्य होणार होते. मात्र तडजोडच न करण्याच्या टोकाच्या भूमिकेमुळे एरवी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास मिळविण्यासाठीही आता या सर्वांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. महायुतीतील अन्य घटक पक्ष भाजपासोबत गेले हे भाजपाची ताकद वाढल्याचे द्योतक आहे. युती तुटली असे विधान भाजपाच्या एकाही नेत्याने केले नाही. ‘आम्ही आता आमच्या मार्गाने जाऊ, जाताना शिवसेनेवर कोणीही टीका करणार नाही’ असा संयमी पवित्राही भाजपा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. मैत्री कधीही संपत नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत. याचा अर्थ निवडणुकीनंतर पुन्हा हे असेच वेगळे राहतील असेही नाही. दोघांचेही लक्ष्य राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचे आहे. त्यामुळे उद्याचे राजकारण आजच्या कटुतेवर अवलंबून राहणार नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात कमी लेखले जात आहे अशी भावना शिवसेनेला वाटत होती त्यातूनच त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. महायुतीतील वेगाने बदलत चाललेल्या घडामोडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत होतील असे वाटत होते. परंतु राष्ट्रवादीनेही काँग्रेसकडून जास्त जागा मिळत नाहीत असे सांगत पंधरा वर्षाचा सत्तेचा संसार मोडून टाकला आहे. असे स्वार्थी राजकारण गेल्या काही दिवसांपासून होत असताना जनतेला कायम गृहीत धरण्याचे काम सर्व पक्षांनी केले आहे. सर्वच पक्ष भांडत असताना कोणीतरी राज्याविषयी बोलायला हवे असे म्हणत मनसेने आजच या गदारोळात उडी मारत स्वतंत्र चूल मांडली. या सगळ्यात ज्यांच्यासाठी नवे सरकार येणार आहे त्या महाराष्ट्राला व जनतेला आम्ही काय देणार आहोत, त्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहोत याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. आता मतदार याकडे कसे पहात आहेत हे १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदानातून दिसून येईल.