शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जागतिक बँकेकडून ३ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा केरळचा विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:33 IST

मुख्यमंत्री पिनराई विजयन : पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करायची आहे

तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व पुराच्या तडाख्यामुळे केरळमध्ये उद्धवस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीसाठी जागतिक बँकेकडून ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याची किती आर्थिक हानी झाली आहे, याचा नेमका आकडा निश्चित झाल्यानंतर लगेचच जागतिक बँकेशी कर्जाबाबत बोलणी सुरू करू, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.

अस्मानी संकटामुळे केरळमध्ये आॅगस्टमध्ये ३८४ जणांचा बळी गेला असून, १४ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. लाखो घरे व पायाभूत सुविधांचीही प्रचंड हानी झाली आहे. त्यांच्या पुनर्निर्माणासाठी देशातूनच निधी उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. केरळने केंद्राकडे २००० कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, जागतिक बँकेकडून केरळने कर्ज घेतल्यास केंद्र सरकार विरोध करणार नाही. केरळला पहिल्या टप्प्यात केंद्राने आतापर्यंत ६०० कोटी रुपयांची मदत केली आहे.

राहुल गांधी यांची भेटकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील चेंगनूर येथील विस्थापितांच्या शिबिरांना मंगळवारी भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेतली. राहुल केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. मदतकार्यात सहभागी झालेले मच्छीमार व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

कर्नाटकला हवे ३ हजार कोटीतीन महिन्यांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसलेल्या कर्नाटकमधील कोडगू, दक्षिण कन्नडा, उडुपी, चिकमंगळुरू, हसन, उत्तर कन्नडा, बेळगाव, म्हैसूर या जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, रस्ते व अन्य सुविधांच्या पुनर्निर्माणासाठी ३ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे कर्नाटकने म्हटले आहे. दोन दिवसांत याचा अहवाल केंद्राला सादर केला जाईल. राज्यातील २,२२५ किमी लांबीच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच काही जिल्ह्यांतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती व २४० पुलांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. तसेच ८०० घरे व ६५ सरकारी इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

७१३.९२ कोटी जमाकेरळच्या पूरग्रस्तांसाठी अवघ्या चौदा दिवसांत ७१३.९२ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाली आहे. त्यातील १३२.६२ कोटी बँका व युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)द्वारे मिळाले आहेत. एकट्या पेटीएमद्वारे ४३ कोटी रुपये या निधीत जमा झाले आहेत. रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे २० कोटी रुपये जमा झाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झालेली ही रक्कम केंद्राने केरळला दिलेल्या अर्थसाह्यापेक्षा २० टक्के अधिक आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधी