शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

प्रेरणादायी! वडील रिक्षा चालक, आईचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू; पण 'तो' खचला नाही, कष्टाने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:44 IST

IAS Govinda Jaiswal : गोविंद यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचे वडील नारायण जयस्वाल यांनीही अनेक त्याग केले

IAS, IPS व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल यांच्या यशामध्ये त्यांचे वडील आणि बहिणींचा मोठं योगदान आहे. गोविंद यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचे वडील नारायण जयस्वाल यांनीही अनेक त्याग केले आणि संघर्षाची नवी कथा लिहिली. 2006 बॅचचे आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल यांची यशोगाथा जाणून घेऊया...

2005 साली IAS गोविंद जयस्वाल यांच्या आई इंदू यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. गोविंदचे वडील एका रिक्षा कंपनीचे मालक होते आणि त्यांच्याकडे 35 रिक्षा होत्या. बायकोच्या उपचारासाठी बहुतेक रिक्षा विकून ते गरीब झाला. त्यावेळी गोविंद सातवीत होता. अनेकवेळा गोविंद, त्याच्या तीन बहिणी आणि वडील सुकी भाकरी खाऊन वेळ काढत. गोविंदच्या वडिलांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यावेळी गोविंदचे संपूर्ण कुटुंब काशीच्या अलईपुरा येथे 10/12 च्या खोलीत राहत होते. त्यांनी आपल्या तीन पदवीधर मुलींच्या लग्नासाठी उरलेल्या रिक्षाही विकल्या. 

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदच्या घरातील काही सामान अजूनही त्या खोलीत ठेवण्यात आले आहे आणि ते त्याचे भाडे देतात. गोविंद जयस्वाल यांनी सुरुवातीचे शिक्षण उस्मानपुरा येथील सरकारी शाळेत केले. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील हरिश्चंद्र विद्यापीठातून मॅथमध्ये ग्रॅज्युएशन केले. 2006 मध्ये, गोविंद यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला आले. गोविंदला पॉकेटमनी पाठवण्यासाठी त्याच्या वडिलांनी सेप्टिक आणि पायाला जखम असूनही रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

गोविंदला पैसे पाठवण्यासाठी त्याचे वडील अनेकवेळा जेवण टाळायचे. त्यांच्या जखमेवर उपचारही झाले नाहीत. त्याचवेळी गोविंदही दिल्लीला गेला होते. पण त्यांनी कोचिंग लावले नाही. तिथल्या मुलांना तो ट्युशन शिकवायचा. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी एक वेळ टिफिन आणि चहा बंद केला होता. 2007 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 48 वा क्रमांक मिळवला.

गोविंद जयस्वाल यांनी प्रेमविवाह केला होता, असे अनेकांना वाटते. पण ते खरे नाही. त्यांची पत्नी चंदना या आयपीएस अधिकारी आहेत आणि दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. हे नाते गोविंद यांच्या मेहुण्याने निश्चित केले होते. चंदनाची आजी गोविंदला भेटायला आली होती. चंदनाच्या घरच्यांना गोविंदचे कुटुंब खूप आवडले आणि नंतर दोघांचे लग्न झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"