शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

"मी देशाचे रक्षण केले, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:15 IST

विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेचा पती तसेच माजी लष्करी जवानाची खंत

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या ४ मे रोजी विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्यांपैकी एका महिलेचा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय दु:खाने सांगितले की, मी मातृभूमीचे रक्षण केले पण स्वत:च्या पत्नीला वाचवू शकलो नाही. 

आसाम रेजिमेंटमधील माजी सुभेदार असलेल्या या व्यक्तीने सांगितले की, मी कारगिल युद्धामध्ये लढलो आहे. भारतीय शांती सेनेचा एक भाग म्हणून मी श्रीलंकेतही अनेक दिवस होतो. मी माझ्या देशाचे संरक्षण केले. पण, मी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर माझे घर, पत्नी, गावकरी यांपैकी कोणाचेही रक्षण करू शकलो नाही. त्याचे मला खूप दु:ख वाटते. 

त्यांनी म्हटले आहे की, ४ मे रोजी सकाळी आमच्या गावातील अनेक घरे संतप्त जमावाने जाळली. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावातील रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. त्यावेळी पोलिस तिथे हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्यांनी गावकऱ्यांची घरे जाळली, महिलांसोबत अतिशय घाणेरडे कृत्य केले, त्या लोकांना अतिशय कडक शिक्षा देण्यात यावी. 

‘केंद्राने मणिपूरमध्ये पाहणी पथके का पाठविली नाहीत?’वांशिक संघर्ष सुरू असलेल्या मणिपूरमध्ये पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथके का पाठविली नाहीत. भाजपच्या बेटी बचाओ या योजनेचे आता बेटी जलाओ योजनेत रूपांतर झाले आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाला शून्य प्रतिसादn मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने गेल्या तीन महिन्यांत तीनदा स्पष्टीकरण मागूनसुद्धा त्या राज्याचे सरकार व अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे. n ४ मे रोजी मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची व अन्य काही प्रकरणांची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे १२ जून रोजी करण्यात आली होती.  विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली, असे रेखा शर्मा यांनी सांगितले. 

जेव्हापासून मणिपूरचा व्हिडीओ पाहिला आहे तेव्हापासून मी ना झोपू शकले ना मला जेवण जात आहे. मला खूप राग आणि वेदना होत आहेत. महिला आणि लहान मुलांची सुरक्षा ही कोणत्याची सरकारची प्राथमिकता असायला हवी.    - सेलिना जेटली, अभिनेत्री

ही भयंकर व लाजिरवाणी घटना आहे. त्या घटनेचा देशभरात निषेध होणे आवश्यक आहे. गुन्हा घडून ७७ दिवस उलटल्यानंतरही पीडित महिलांना न्याय मिळत नाही हे अतिशय गंभीर आहे. मणिपूरच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे.    - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री

मणिपूरमधील गंभीर परिस्थितीमुळे मी अतिशय चिंतेत आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अपराधांना क्षमा करण्याच्या सर्व शब्दांना काहीच अर्थ नाही.    - करीना कपूर, अभिनेत्री

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSocial Viralसोशल व्हायरलIndian Armyभारतीय जवान