शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो : पर्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 07:55 IST

दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत काढले.

पणजी: दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत काढले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत ही मुलाखत झाली.गोवा लोकमतचे संपादक राजू नायक यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची मुलाखत चांगलीच रंगली व तितकीच मुख्यमंत्र्यांच्या दिलखुलास उत्तरांमुळे हृदयस्पर्शीही ठरली. पर्रीकर हे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ राजकारणात व्यग्र असतात. माणसाला व्यक्तिगत जीवनही असते, यावर लक्ष वेधले असता, पर्रीकर म्हणाले, ‘माझा पिंड राजकारण्याचा नाही. राजकारण्याचा पिंड असता, तर मी दिल्लीत टिकलो असतो. कारण दिल्लीत खरं राजकारण होतं. माझी वृत्ती लोकसंपर्काची आहे. राजकारणातही मी फार काळ थांबण्यासाठी आलो नव्हतो. १० वर्षे राजकारण करणार आणि परतणार असे वचन मी तिला दिले होते, ती माझी पत्नी या जगातून निघून गेली. त्यामुळे राजकारणातच रमलो’.यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्री बनलो; परंतु एकदाही कार्यकाल पूर्ण करता आला नाही. आता चौथ्यांदा तरी कार्यकाळ पूर्ण कराल काय, असे विचारले असता, ते म्हणाले की, कार्यकाळ अपूर्ण सोडण्याची इच्छा कोणालाच नसते. पहिल्यांदा विधानसभा बरखास्त केली ती पुन्हा सत्ता मिळणार या विश्वासानेच. दुसºयांदा राज्यपालांनी मला हटविले. तिसºयांदा मुख्यमंत्री बनलो, तेव्हा अर्ध्यावर सोडून दिल्लीला जावे लागले. आता चौथ्यांदा मात्र कार्यकाळ पूर्ण करीन, असा विश्वास वाटतो. राज्याच्या आर्थिक सामर्थ्याबद्दल विचारले असता पर्रीकर म्हणाले, राज्यात केवळ एकाच प्रकारच्या पर्यटनावर भर देणे योग्य ठरणार नाही. इव्हेंट टुरिझम ही संकल्पना लक्षात घेऊन गोव्यात अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरू केला. तसेच ग्रामीण पर्यटनावरही भर देण्यात आल्याचे ते म्हणाले.मुलांना राजकारणात रस नाही! : आपल्या कुटुंबियांना राजकारणात उतरविण्याच्या प्रवाहाच्या विसंगत कल मुख्यमंत्र्यांनी दाखविला. आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात रस नाही. ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकºया भाजण्यासारखा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.’