शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:45 IST

प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान रामललाचे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

आचार्य सत्येंद्र दास गेल्या ३२ वर्षांपासून रामललाची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे नऊ महिने ते रामललाची पुजारी म्हणून पूजा करत होते. बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा आचार्य सत्येंद्र दास तिथे उपस्थित होते. त्यानंतर एका तंबूत रामलला विराजमान होते. यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं सत्येंद्र दास यांनी सांगितले.

रामललाची ही अवस्था भक्तांसाठी अत्यंत क्लेशदायक होती, परंतु कायदेशीर बंधनांमुळे भाविक इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. मी अनेकदा रामललासमोर रडत असे, असं सत्येंद्र दास म्हणाले. तसेच आता रामनगरीत सौभाग्याचा नवा सूर्य उगवत आहे. भव्य मंदिरात रामललाला विराजमान झालेले पाहण्याचा उत्साह इतका आहे की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही, अशी भावना देखील सत्येंद्र दास यांनी व्यक्त केल्या आहेत. 

राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नाही-

भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या