शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:45 IST

प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान रामललाचे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

आचार्य सत्येंद्र दास गेल्या ३२ वर्षांपासून रामललाची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे नऊ महिने ते रामललाची पुजारी म्हणून पूजा करत होते. बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा आचार्य सत्येंद्र दास तिथे उपस्थित होते. त्यानंतर एका तंबूत रामलला विराजमान होते. यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं सत्येंद्र दास यांनी सांगितले.

रामललाची ही अवस्था भक्तांसाठी अत्यंत क्लेशदायक होती, परंतु कायदेशीर बंधनांमुळे भाविक इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. मी अनेकदा रामललासमोर रडत असे, असं सत्येंद्र दास म्हणाले. तसेच आता रामनगरीत सौभाग्याचा नवा सूर्य उगवत आहे. भव्य मंदिरात रामललाला विराजमान झालेले पाहण्याचा उत्साह इतका आहे की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही, अशी भावना देखील सत्येंद्र दास यांनी व्यक्त केल्या आहेत. 

राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नाही-

भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या