शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:11 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवले असून, निवडणूक आयोगाच यात सामील असल्याचा आरोप केला आहे. आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात असताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाला सुनावलं.

Voter List Allegation News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरच मत चोरीचा आरोप केला आहे. बोगस मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे दाखवत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. केंद्रीय निवडणूक आयोग राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगत शपथपत्र द्या, असेही म्हणत आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी राहुल गांधींची बाजू घेत निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र आणि दिल्लीतील विधानसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. आता त्यांनी मतदार यांद्यामधील बोगस मतदारांचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले. त्यानंतर आयोगाने राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगितले. आयोगाने त्यांना आरोप खरे आहेत, तर शपथपत्र द्या, असे आव्हानही दिले आहे. 

रावत राहुल गांधींच्या आरोपावर काय बोलले?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी द टेलिग्राफशी बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले, "मी जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त होतो, तेव्हा आमचे धोरण होते की, जर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आरोप केले, तर आम्ही त्यांची चौकशी करायचो आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायचो. जेणेकरून निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा. माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही त्यांना (राजकीय पक्ष) आधी तक्रार करा, असे सांगितले नाही", असे म्हणत रावत यांनी निवडणूक आयोगालाच अप्रत्यक्षपणे सुनावले. 

७ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील काही मतदारसंघातील बोगस मतदारांची प्रकरणे समोर मांडली. कर्नाटकात एकाच घराच्या पत्त्यावर कसे ८० मतदार आहेत. असंख्य मतदारांचे फोटोच नाहीत. वडिलांची नावे नाहीत. मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे, याबद्दलचे मुद्दे त्यांनी मांडले.

देशात मतांची चोरी सुरू आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगच त्यात सहभागी आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापले असून, विरोधी पक्षाचे खासदार आणि नेते आता दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही काढणार आहेत. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणfraudधोकेबाजी