शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:11 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवले असून, निवडणूक आयोगाच यात सामील असल्याचा आरोप केला आहे. आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात असताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाला सुनावलं.

Voter List Allegation News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरच मत चोरीचा आरोप केला आहे. बोगस मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे दाखवत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. केंद्रीय निवडणूक आयोग राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगत शपथपत्र द्या, असेही म्हणत आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी राहुल गांधींची बाजू घेत निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र आणि दिल्लीतील विधानसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. आता त्यांनी मतदार यांद्यामधील बोगस मतदारांचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले. त्यानंतर आयोगाने राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगितले. आयोगाने त्यांना आरोप खरे आहेत, तर शपथपत्र द्या, असे आव्हानही दिले आहे. 

रावत राहुल गांधींच्या आरोपावर काय बोलले?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी द टेलिग्राफशी बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले, "मी जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त होतो, तेव्हा आमचे धोरण होते की, जर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आरोप केले, तर आम्ही त्यांची चौकशी करायचो आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायचो. जेणेकरून निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा. माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही त्यांना (राजकीय पक्ष) आधी तक्रार करा, असे सांगितले नाही", असे म्हणत रावत यांनी निवडणूक आयोगालाच अप्रत्यक्षपणे सुनावले. 

७ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील काही मतदारसंघातील बोगस मतदारांची प्रकरणे समोर मांडली. कर्नाटकात एकाच घराच्या पत्त्यावर कसे ८० मतदार आहेत. असंख्य मतदारांचे फोटोच नाहीत. वडिलांची नावे नाहीत. मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे, याबद्दलचे मुद्दे त्यांनी मांडले.

देशात मतांची चोरी सुरू आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगच त्यात सहभागी आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापले असून, विरोधी पक्षाचे खासदार आणि नेते आता दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही काढणार आहेत. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणfraudधोकेबाजी