शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

राज्यपाल झाल्यापासून माझा कोणताही पक्ष नव्हता- रामनाथ कोविंद

By admin | Updated: June 23, 2017 13:48 IST

मी राज्यपाल झाल्यापासून माझा कोणताही पक्ष नव्हता.असं मत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23- मी राज्यपाल झाल्यापासून माझा कोणताही पक्ष नव्हता. विकासाचं ध्येय मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्याचप्रमाणे देशातील सर्वौच्च राष्ट्रपतिपद हे नेहमी कोणत्याही पक्षापेक्षा आणि राजकारणापेक्षा मोठं असलं पाहिजे आणि देशाचा विकास हे प्रमुख ध्येय असलं पाहिजे, असं मत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे.  शुक्रवारी रामनाथ कोविंद यांनी  संसदेत राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. भारताच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. तसंच राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी मला ज्या पक्षांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो, असंही रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएतील घटक पक्षांच्या उपस्थितीत कोविंद यांनी अर्ज दाखल केला. यावेळी संसदेमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं.  रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे एनडीएतील अनेक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं पण उद्धव ठाकरे यावेळी गैरहजर होते. 
 
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होणार आहे. 
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नाव जाहीर करण्यात आलं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दलित चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. रामनाथ कोविंद यांच्या निवडीमुळे ही चर्चा खरी ठरली. भाजपचा दलित चेहरा अशी रामनाथ कोविंद यांची ओळख आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती.
 
कोण आहेत रामनाथ कोविंद ?
रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केलं आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता.  ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.