शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:24 IST

दलित प्रश्नांवर २ मे रोजी मोर्चा

मुंबई : सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही नामांतराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. आता केंद्रीय मंत्री असलो तरी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. २ मे रोजी मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंतर्फे आयोजित मोर्चात सामील होणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंप्रमाणे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावरही कारवाई करावी, या हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून तिच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील खटले काढून घ्यावे, या मागणीसाठी रिपाइंतर्फे २ मे रोजी राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यावरील मोर्चात रामदास आठवले सहभागी होणार आहेत.लवकर कायदा करावाकोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भातील मागण्यांसोबतच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या संपूर्ण संरक्षणाची मागणी पक्षाने केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासींवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यात यावा, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करावा, दलित-अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी रिपाइंचा मोर्चा असणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले