शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:24 IST

दलित प्रश्नांवर २ मे रोजी मोर्चा

मुंबई : सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही नामांतराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. आता केंद्रीय मंत्री असलो तरी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. २ मे रोजी मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंतर्फे आयोजित मोर्चात सामील होणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंप्रमाणे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावरही कारवाई करावी, या हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून तिच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील खटले काढून घ्यावे, या मागणीसाठी रिपाइंतर्फे २ मे रोजी राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यावरील मोर्चात रामदास आठवले सहभागी होणार आहेत.लवकर कायदा करावाकोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भातील मागण्यांसोबतच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या संपूर्ण संरक्षणाची मागणी पक्षाने केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासींवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यात यावा, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करावा, दलित-अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी रिपाइंचा मोर्चा असणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले