शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

"मी लष्कराच्या कमांडरला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले"; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:39 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती पाहता भारत आणि जगात शांतता राखण्यासाठी आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराला सांगितले.

'भारत नेहमीच शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराच्या कमांडरना सांगितले, असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आज राजनाथ सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

माध्यमांसोबत बोलताना सिंह म्हणाले, "जगातील भारत हा एकमेव देश आहे या देशाने 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश दिला आहे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारत नेहमीच शांतीचा उपासक आहे, होता आणि राहील. पण आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार करून मी माझ्या लष्कराच्या कमांडर्सना सांगितले होते की, जगात आणि भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपली शांतता भंग पावू नये.

आता राजकीय 'दंगल' होणार! विनेश फोगट करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार?

काही दिवसापूर्वी लखनौमध्ये लष्कर कमांडर्सची  परिषद झाली, यावेळी सिंह यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी कमांडरना या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी, भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अंदाज घ्या आणि सामोरे जाण्यासाठी तयार रहा. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि शेजारील देशांमधील घडामोडी लक्षात घेऊन सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

राजनाथ सिंह म्हणाले, “जागतिक अस्थिरता असूनही, भारत तुलनेने शांततेच्या वातावरणात शांततेने विकसित होत आहे. मात्र, आव्हानांच्या वाढत्या संख्येमुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता राखणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, वर्तमानात आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा घटक असणे आवश्यक आहे. आपच्याकडे अतुलनीय प्रतिकार क्षमता असली पाहिजे, असंही सिंह म्हणाले. 

राजनाथ सिंह यांनी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही लष्करी नेतृत्वाला केले. "हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान