शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:15 IST

आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले.

गुवाहाटी :  कितीही अपमानास्पद बोला, मी शिवभक्त आहे. सारे विष गिळून टाकतो; परंतु इतर कुणाचा अपमान झाला तर मला सहन होत नाही, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. यावेळी दरांग येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव

शनिवारी पंतप्रधान मोदी गुवाहाटीत दाखल झाले. विमानतळावरून ते ज्येष्ठ गायक भारतरत्न भूपेन हजारिका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित बैठकीत सहभागी झाले. मल्लिकार्जुन खरगे यांनी हजारिका यांच्याबाबत ‘मोदी नाचगाणे करणाऱ्यांना भारतरत्न देत आहे’, अशा शब्दांत टीका केली होती. याची आठवण मोदी यांनी करून दिली.

लष्कराऐवजी दहशतवाद्यांचे समर्थन कशासाठी?

भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांचे समर्थन करीत असल्याची टीका करून मोदी म्हणाले, ‘घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत जमीन लाटू देणार नाही. लोकसंख्येचा समतोल बदलण्याचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही.’

ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. याचे समर्थन करण्याऐवजी काँग्रेस घुसखोर व राष्ट्रद्रोही शक्तींचा बचाव करीत आहे, असा आरोपही मोदी यांनी या वेळी केला. माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.

आमच्यासाठी नागरिक देवोभव:

नुमालीगडमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांचे हक्क नाकारण्यात आले. आदिवासींवर अन्याय झाला. आमचा मंत्र ‘नागरिक देवोभव:’ असा आहे. जनता हाच आमच्यासाठी देव. नागरिकांची गैरसोय व्हायला नको म्हणून भाजप सरकार कटिबद्ध आहे.’ एका विशिष्ट वर्गाच्या तुष्टीकरणातून काँग्रेसला सत्ता मिळत होती. भाजपला तुष्टीकरणावर नव्हे, संतुष्टीकरणावर भर आहे, असेही ते म्हणाले.

पूर्वी घुसखोरांना संरक्षण मिळाले : आसाममध्ये घुसखोरांची समस्या मोठी आहे. काँग्रेस सरकारने त्यांना जमिनी दिल्या, संरक्षण दिले. मतांच्या लालसेने आसामची पूर्ण समाजरचना विस्कळीत केली. आता भाजप सरकार आसामच्या लोकांना सोबत घेऊन आव्हानांचा सामना करीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी