शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:15 IST

आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले.

गुवाहाटी :  कितीही अपमानास्पद बोला, मी शिवभक्त आहे. सारे विष गिळून टाकतो; परंतु इतर कुणाचा अपमान झाला तर मला सहन होत नाही, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. यावेळी दरांग येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव

शनिवारी पंतप्रधान मोदी गुवाहाटीत दाखल झाले. विमानतळावरून ते ज्येष्ठ गायक भारतरत्न भूपेन हजारिका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित बैठकीत सहभागी झाले. मल्लिकार्जुन खरगे यांनी हजारिका यांच्याबाबत ‘मोदी नाचगाणे करणाऱ्यांना भारतरत्न देत आहे’, अशा शब्दांत टीका केली होती. याची आठवण मोदी यांनी करून दिली.

लष्कराऐवजी दहशतवाद्यांचे समर्थन कशासाठी?

भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांचे समर्थन करीत असल्याची टीका करून मोदी म्हणाले, ‘घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत जमीन लाटू देणार नाही. लोकसंख्येचा समतोल बदलण्याचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही.’

ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. याचे समर्थन करण्याऐवजी काँग्रेस घुसखोर व राष्ट्रद्रोही शक्तींचा बचाव करीत आहे, असा आरोपही मोदी यांनी या वेळी केला. माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.

आमच्यासाठी नागरिक देवोभव:

नुमालीगडमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांचे हक्क नाकारण्यात आले. आदिवासींवर अन्याय झाला. आमचा मंत्र ‘नागरिक देवोभव:’ असा आहे. जनता हाच आमच्यासाठी देव. नागरिकांची गैरसोय व्हायला नको म्हणून भाजप सरकार कटिबद्ध आहे.’ एका विशिष्ट वर्गाच्या तुष्टीकरणातून काँग्रेसला सत्ता मिळत होती. भाजपला तुष्टीकरणावर नव्हे, संतुष्टीकरणावर भर आहे, असेही ते म्हणाले.

पूर्वी घुसखोरांना संरक्षण मिळाले : आसाममध्ये घुसखोरांची समस्या मोठी आहे. काँग्रेस सरकारने त्यांना जमिनी दिल्या, संरक्षण दिले. मतांच्या लालसेने आसामची पूर्ण समाजरचना विस्कळीत केली. आता भाजप सरकार आसामच्या लोकांना सोबत घेऊन आव्हानांचा सामना करीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी