शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पाणपोई उरल्या नावाला....

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झालेली आहे.

जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झालेली आहे.

गणेश कॉलनीत पाणपोईला कुलूप..
गणेश कॉलनी भागातील पाणपोई चांगल्या स्थितीत आहे, मात्र तिला सध्या कुलूप लावलेले आहे. त्यामुळे या भागात अनेकजण पाणी पिण्यासाठी येतात मात्र कुलूप पाहून त्यांना परत जावे लागते.

जिल्हा रुग्णालयात काही नळ बंद...
जिल्हा रुग्णालयात समोरच्या बाजूला संत गरीबदास चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेली पाणपोई उत्तम स्थितीत असून तेथे पाणीही उपलब्ध असते. मात्र रुग्णालय परिसरात दुसर्‍या बाजूला असलेल्या पाणपोईचे काही नळ बंद आहे. एका बाजूला असलेल्या तीन नळांपैकी एकच नळ सुरू आहे तर इतर बाजूंचेही नळ बंद आहे.

बसस्थानक परिसरात पाणपोईत अन्न...
बसस्थानक परिसरात असलेल्या पाणपोईमध्ये पाणी उपलब्ध आहे. आजूबाजूला स्वच्छताही असते, मात्र पाणपोईवर पाणी पिताना प्रवासी तेथेच हात धुतात व डब्यातील उष्टे अन्नही तेथेच टाकतात. त्यामुळे तेथे कधीकधी पाणी वाहत नाही.

पुष्पलता बेंडाळे चौक, क्रीडा संकुल परिसर...
पुष्पलता बेंडाळे चौकामध्ये पाण्याच्या सोयीसाठी माठ ठेवण्यात आले आहे. मात्र त्यात पाणीच नसल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना त्याचा काही फायदा होत नाही. क्रीडा संकुल परिसरातदेखील अशीच अवस्था आहे. येथे पाण्याचे रांजण तर आहे, मात्र त्यात पाणीच नाही, त्यामुळे त्याचाही काही उपयोग नाही.