शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही संशयीत चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 06:05 IST

पशुवैद्यकीय तरुणीवर २८ नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली.

हैदराबाद : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशीच भावना व्यक्त केली आहे.पशुवैद्यकीय तरुणीवर २८ नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.देशात ठिकठिकाणी हैदराबादच्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी मोर्चे निघाले होते. बलात्काºयांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सोपविण्याचे जाहीर केले होते.हैदराबादमधील या धक्कादायक प्रकारने दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ साली निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्काराची व तिच्या हत्येच्या घटनेची आठवण सर्वांच्या मनात जागी झाली. हैदराबादमधील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेण्यात आले होते.चौघांना ठार माल्याबद्दल अनेक खासदारांनी आनंद व्यक्त केला आहे, तर मेनका गांधी यांनी पोलिसांनी आरोप सिद्ध न झालेल्या संशयीतांना याप्रकारे ठार मारणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. भाजपच्या अनेक खासदारांनी मात्र चौघांना ठार मारण्याचे समर्थन केले आहे. उन्नाव बलात्कारपीडितेला जाळण्याचा प्रकार गुरुवारी घडल्याच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद प्रकरणातील संशयीतांना चकमकींमध्ये पोलिसांनी ठार मारले, हे चांगलेच केले, असे मत देशभरात व्यक्त होत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पालकांनीही चौघांना ठार मारल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. निर्भयाच्या बलात्काºयांना न्यायालयाने फाशी ठोठावूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे ते संतप्त आहेत.

- पशुवैद्यक तरुणीवर काही दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार करणारे चारही आरोपी शुक्रवारी पहाटे चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिसांनीच दिली. तरुणीवर बलात्कार करून, जिथे जाळण्यात आले, त्याचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी चौघा संशयीतांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी नेते होते.- तिथे पोहोचल्यानंतर त्या चौघांनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार केला.चौघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यांना शरण येण्याचे आवाहनही चौघांनी धुडकावून लावले. त्यामुळे गोळ्या झाडणाºया या संशयीतांवर आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात चौघे ठार झाले, असे पोलीस आयुक्त व्ही सी. सज्जनार यांनी सांगितले.- मोहम्मद अली उर्फ मोहम्मद अरिफ, जोलू शिवा, जोलू नवीनकुमार, चिंताकुंता चेन्नाकेशवुलू अशी चौघांची नावे असून ते ट्रक व्यवसायामध्ये काम करत होते. चौघेही २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

चौघांच्या कुटुंबीयांना धक्कायेथील पशुवैद्यक तरुणीच्या बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या चौघे जण पोलीस चकमकीत मारले गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवºयाला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे.हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बºयापैकी पैसा मिळविला. मात्र दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.हा अधिकार कोणी दिला?बलात्कारासारखे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाºया नराधमांना योग्य शिक्षा झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी संशयीतांना ठार मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असे सवालही अनेकांनी उपस्थित केले आहेत. शिक्षा सुनावणे हे न्यायालयाचे काम आहे. पोलिसांनी अशा चकमकीत आरोपींना ठार मारणे योग्य नव्हे असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.घटनाक्रम1)सारा प्रकार जाणून घेण्यासाठी पोलिसांनी चारही संशयीतांना पहाटेच हैदराबादमधील घटनास्थळी बसने नेले2)बसने उतरल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाण दाखवण्यास चौघांना सांगितले3)तिथे पोहाचताच चौघांनीही पोलिसांचर हल्ला केला4)त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, ज्यात चौघेही ठार झाले.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण