शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नवरा-बायको बसले भांडत, कोर्टाने ठेवले मुलीचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 04:58 IST

न्यायालय म्हणाले : नाव ही ओळख, त्यात विलंब नको

कोची : केरळच्या कोची येथे तीन वर्षांच्या मुलीचे नाव नेमके काय ठेवावे यावरून आई-वडिलांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. दोघांत नावावर एकमत होत नसल्याने अखेर प्रकरण न्यायालयात पोहोचले. ३० सप्टेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना मुलीचे नाव अखेर

निश्चित केले. नाव ठेवण्यास उशीर झाल्याने मुलीच्या भविष्यावर परिणाम होत होता. सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या ती मागे पडत होती. पालकांच्या लढ्यापेक्षा मुलाचे कल्याण महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले. (वृत्तसंस्था)

आम्हाला मुलीचे नाव ठेवणे भाग पडले

मुलीचे नाव ठेवण्यासाठी आम्ही पालकांच्या अधिकार क्षेत्राचा वापर केला. आम्ही असहाय आहोत, पालकांतील वाद मिटविण्याच्या प्रयत्नांना वेळ लागेल. यादरम्यान नाव नसल्याने मूल सर्व सुविधांपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे पालकांच्या हक्कापेक्षा मुलीच्या नावाला प्राधान्य दिल्याचे खंडपीठाने म्हटले. नाव निवडताना न्यायालयाने सांस्कृतिक विचार, पालकांचे हित व सामाजिक नियम या घटकांचा विचार केला.

अखेर मिळाले नाव...

अखेर दोन्ही पक्षांमधील वाद मिटविण्यासाठी न्यायालयाने मुलीचे नाव ‘पुण्य’ ठेवले आणि वडिलांचे नावही समाविष्ट करण्याचे आदेश दिले. ‘नायरच्या नावासोबत बालगंगाधरनही जोडले जावे’, असा निकाल न्यायालयाने दिला.

असा सुरू झाला वाद

आई आपल्या मुलीला शाळेत प्रवेश देण्यासाठी गेली, तेव्हा मुलीच्या नावाचा प्रश्न उद्भवला.  शाळेने नावाशिवाय जन्माचा दाखला स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आई निबंधक कार्यालयात गेली आणि जन्माच्या दाखल्यावर ‘पुण्य नायर’ नाव लिहायला सांगितले. मात्र, निबंधकांनी दोन्ही पालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले. आई-वडील विभक्त असल्याने नावावर एकमत होऊ शकले नाही. वडील मुलीचे नाव ‘पद्मा नायर’ ठेवू इच्छित होते.

टॅग्स :Courtन्यायालय