शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 04:45 IST

काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे

श्रीनगर : काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी दिली.दूरदर्शनने आयोजिलेल्या एका समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे दोन मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. सत्यपाल मलिक म्हणाले की, मी काश्मीरचा राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारली त्यावेळी असलेल्या परिस्थितीत आता खूपच सुधारणा झाली आहे. हुरियत नेत्यांनी चर्चेस तयार व्हावे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याआधी आवाहन केले होते; पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. आता आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे हुरियत नेते किमान बोलून तरी दाखवत आहेत.चर्चेसाठी तयार असल्याचे वक्तव्य हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक यांनी एका मुलाखतीत केले होते. ते म्हणाले होते की, मोदी सरकारने काश्मीरमधील थांबलेली राजकीय प्रक्रिया पुन्हा प्रवाही केली पाहिजे. राज्यात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. या दिशेने सरकारने योग्य पावले उचलल्यास त्याला आम्ही नक्की सहकार्य करू. अशाच प्रकारचे आवाहन मिरवाईज उमर फारुक यांनी श्रीनगरमधील जामा मशिदीमध्ये स्थानिक नागरिकांसमोर केलेल्या भाषणात म्हटले होते की, काश्मीरचा प्रश्न संघर्ष किंवा लष्करी बळाचा वापर करून नव्हे, तर चर्चेच्या माध्यमातूनच सोडविला जाऊ शकतो.दगडफेकीच्या प्रकारांत झाली घटकेंद्र सरकारशी चर्चेची तयारी दर्शविणारे मिरवाईज उमर फारुक यांना हे सध्या स्थानबद्धतेत आहेत. काश्मीर विद्यापीठातील पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहाण्यास मिरवाईज यांना शनिवारी मनाई करण्यात आली. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांत सामील होणाऱ्या युवकांच्या संख्येत, तसेच शुक्रवारी नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा दलांवर केल्या जाणाºया दगडफेकीच्या प्रकारात घट झाली आहे. दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना त्या मार्गापासून परावृत्त करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्यपाल मलिक म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारण