शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मानवाधिकार आयोगाची यूपी सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:58 IST

रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनअभावी ६३ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे.मानवाधिकार आयोगाने मीडियातील वृत्ताची स्वत: हून दखल घेत नोटीस जारी केली आहे. यातील जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करत चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. आॅक्सिजनचा पुरवठा करणाºया कंपनीची थकीत रक्कम न दिल्याने या कंपनीने पुरवठा बंद केला. परिणामी या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी उत्तरप्रदेश सरकारने रविवारी हा दावा फेटाळत हे मृत्यू मेंदूज्वरामुळे झाल्याचे म्हटले आहे.उत्तरप्रदेशातील आरोग्य विभाग, हॉस्पिटल प्रशासन यांचा हा बेजबाबदारपणा असल्याचेही मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. लखनौमध्ये ९ ते ११ आॅगस्ट या काळात झालेल्या शिबिरात आपण मेंदूज्वराचा मुद्दा उपस्थित केला होता, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.>पाच कोटींची मदतगोरखपूर येथील घटनेने चिंतित होऊन भाजप खासदार वरुण गांधी यांनी सुलतानपूर जिल्हा रुग्णालयात बालरोग विभाग सुरु करण्यासाठी खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. उपचारावाचून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी १०० खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोरखपूरमध्ये आणखी सहा मुलांचा मृत्यूगोरखपूर : येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये गत काही दिवसांत ६० मुलांचा मृत्यू झाला असतानाच शनिवार ते सोमवारपर्यंत तीन दिवसांत आणखी ६ मुलांचा मेंदुज्वराने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी ही माहिती दिली.