शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘हुडहुड’ने झाले कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: October 15, 2014 01:44 IST

विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली

विशाखापट्टणम : विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली. या पार्श्वभूमीवर वादळग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केली. एकट्या इस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी आॅफ आंध्र प्रदेश लिमिटेडचेच ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. यात उपकेंद्रे, उच्चक्षमता असलेली पारेषण लाईन, विजेचे खांब आणि वितरणाचे जाळे आदींचा समावेश आहे. चक्रीवादळाने सुमारे १६ हजार विजेचे खांब कोसळले असून जवळपास ६ हजार ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेड (विजाग स्टील प्रकल्प) ला अंदाजे एक हजार कोटी, भारतीय नौसेनेला दोन हजार कोटी, आंध्र विद्यापीठाला ३०० कोटी तर विजाग विमानतळाला ५०० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे नायडू यांनी सांगितले. मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी ते स्वत: येथे हजर आहेत. ते म्हणाले, विजाग पोलाद प्रकल्पाचे दरदिवसाला ३० ते ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ते सुरळीत व्हायला आणखी १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. भूपृष्ठ वाहतुकीचे जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)