शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

१-२ नाही, भारतीय रेल्वेचे कर्ज तब्बल ८ हजार कोटींनी वाढले! २०२० पासून अनेकपटीने भर पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:02 IST

Indian Railway Debt: कोरोना काळापासून भारतीय रेल्वेवरील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगितले जात आहे.

Indian Railway Debt: गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. स्टेशन आधुनिकीकरणपासून विविध प्रकारच्या नव्या प्रीमियम रेल्वेसेवा, प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षितता यांवर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेवरील कर्जात गेल्या ४ वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांचे भर पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन २०२० नंतर हा आकडा अनेकपटीने वाढला, असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कर्जात ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बड्या प्रकल्पांना कर्जाचा आलेख वाढत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. याशिवाय कोरोना काळातही रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. सन २०१९-२० मध्ये कर्ज २० हजार ३०४ कोटी रुपये होते, ते २०२०-२१ मध्ये २३ हजार ३८६ कोटी रुपये झाले. २०२१-२२ मध्ये हा आकडा २८ हजार ७०२ कोटी रुपये होता. रोलिंग स्टॉक, मालमत्ता खरेदी आणि इतर प्रकल्पांसाठी भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून मदत घेतल्याचे वृत्त आहे.

भारतीय रेल्वेवरील कर्जाचा बोजा वाढतच राहिला

सन २०२२-२३ मध्येही रेल्वेला कर्जातून दिलासा मिळालेला नाही. भारतीय रेल्वेवरील कर्जाचा हा आकडा ३४ हजार १८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही अनेक मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करत आहोत. यासह, रेल्वे कर्ज कमी करण्यासाठी अंतर्गत सेवांमधून महसूल वाढवण्याचे मार्ग शोधत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, सन २०२०-२१ मध्ये कोरोना काळात भारतीय रेल्वेने रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली होती. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भारतीय रेल्वेला ७९ हजार ३९८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. रेल्वेचे म्हणणे आहे की, या कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू होईल. विशेष म्हणजे अनेक मोठे रेल्वे प्रकल्पही एकाच वेळी सुरू आहेत. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव