शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार - मोदींवर नितिश कुमारांचा हल्ला

By admin | Updated: August 18, 2015 18:28 IST

आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमारांनी यांनी

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १८ - आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. जसं लोकसभा निवडणुकीच्या आधी बोलायला काय जातं, द्यायचं थोडीच आहे? अशा प्रकारे भाषणं केली तोच प्रकार बिहारमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा करत असल्याचा आरोप नितिश कुमारांनी केला आहे.
मोठ- मोठ्या वल्गना मोदी करतात, परंतु या सगळ्या पॅकेजसाठी पैसा कुठून आणणार, त्यासाठी बजेटमध्ये का तरतूद केली आहे ते तरी सांगावं ना त्यांनी असा टोला नितिश कुमारांनी केला.
पूरग्रस्तांसाठी मदत देणं हे कर्तव्य सगळी राज्य पार पाडतात, परंतु ते कुणी बोलून दाखवत नाही. गुजरातने पाच कोटी रुपये दिले आणि असा दावा केला की या राज्यानेच सगळ्यात जास्त पैसे दिले. ही वस्तुस्थिती नसल्याचं सांगताना बिहारनेही अनेक राज्यांना आर्थिक सहाय्य केले असल्याचे सांगितले, तसेच देणारा बोलून दाखवत नसल्याचे नितिश कुमार म्हणाले.
 
नितिश कुमारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
 
- ज्या ज्या गोष्टी आधी प्रस्तावित केल्या आहेत, त्याच मोदींनी सादर केलेल्या पॅकेजमध्ये आहेत... हे सगळं अद्भुत आहे.
- विमानतळ बांधणार हे ऐकून ऐकून आम्ही थकलो आता. जी जमीन लागेल ती आमच्याकडे मागू नका, तिच्यासाठी लागमारा खर्चही करा.
- २०१३ मध्ये गॅस पाइपलाइनच्या योजना ठरल्या होत्या, ते पण या योजनेतच समाविष्ट केलंय... काय बोलणार आता?
- रस्त्यांवर आम्ही एक हजार कोटी रुपये खर्च केले, ते तरी द्या.
- नरेंद्र मोदी व नितिन गडकरी यांनी हजारो कोटींच्या नुसत्या घोषणा केल्या नी लाखोंच्या नोक-या निर्माण करण्याचं आश्वासन देतायत, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे... बिहारच्या नुसत्या बोली लावत आहेत, सध्याची बोली सव्वा लाख कोटी रुपयांची आहे.
- केंद्र सरकारला बिहारच्या विकासासाठी आम्ही सविस्तर रोडमॅप दिला होता, ब-यापैकी आम्ही कामही सुरू केलं, भरपूर पैसे खर्चही केले परंतु केंद्राकडून पैसेच येत नसल्याची टीका नितिश कुमारांनी केली.
- आधीपासून अस्तित्वात असलेल्या योजनाच पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाविष्ट केल्याचे सांगत एकही कोंबडी कितनी बार हलाल करोगे असं विचारत नितिश कुमारांनी मोदींची खिल्ली उडवली.
-  हे बिहार आहे, गुजरात नाही... विसरू नका. 
- बिहारमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करत असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. वीज पुरवठ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे, याबाबत बिहारच्या जनतेला सर्व ठावूक आहे.
- एकीकडे को-ऑपरेटिव्ह फेडरलीझमचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे राज्यांना याचकासारखी वागणूक द्यायची ही दुटप्पी वागणूक चुकीची आहे.
- केवळ आर्थिक पॅकेजवर आम्ही संतुष्ट नाही तर विशेष राज्याचा दर्जा बिहारला हवा आहे.
- बिहारमध्ये गैरभाजपाचं सरकार असलेलं पंतप्रधानांना सहन होत नाही आहे.
- बिहारच्या वाट्याचं जे आहे ते बिहारला मिळायलाच पाहिजे. 
- विशेष पॅकेज हा आमचा हक्क आहे, उपकार नाही. 
- पॅकेज दिले म्हणजे असे वाटले की मोदी बिहारची बोली लावत आहेत.