शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार - मोदींवर नितिश कुमारांचा हल्ला

By admin | Updated: August 18, 2015 18:28 IST

आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमारांनी यांनी

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १८ - आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. जसं लोकसभा निवडणुकीच्या आधी बोलायला काय जातं, द्यायचं थोडीच आहे? अशा प्रकारे भाषणं केली तोच प्रकार बिहारमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा करत असल्याचा आरोप नितिश कुमारांनी केला आहे.
मोठ- मोठ्या वल्गना मोदी करतात, परंतु या सगळ्या पॅकेजसाठी पैसा कुठून आणणार, त्यासाठी बजेटमध्ये का तरतूद केली आहे ते तरी सांगावं ना त्यांनी असा टोला नितिश कुमारांनी केला.
पूरग्रस्तांसाठी मदत देणं हे कर्तव्य सगळी राज्य पार पाडतात, परंतु ते कुणी बोलून दाखवत नाही. गुजरातने पाच कोटी रुपये दिले आणि असा दावा केला की या राज्यानेच सगळ्यात जास्त पैसे दिले. ही वस्तुस्थिती नसल्याचं सांगताना बिहारनेही अनेक राज्यांना आर्थिक सहाय्य केले असल्याचे सांगितले, तसेच देणारा बोलून दाखवत नसल्याचे नितिश कुमार म्हणाले.
 
नितिश कुमारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
 
- ज्या ज्या गोष्टी आधी प्रस्तावित केल्या आहेत, त्याच मोदींनी सादर केलेल्या पॅकेजमध्ये आहेत... हे सगळं अद्भुत आहे.
- विमानतळ बांधणार हे ऐकून ऐकून आम्ही थकलो आता. जी जमीन लागेल ती आमच्याकडे मागू नका, तिच्यासाठी लागमारा खर्चही करा.
- २०१३ मध्ये गॅस पाइपलाइनच्या योजना ठरल्या होत्या, ते पण या योजनेतच समाविष्ट केलंय... काय बोलणार आता?
- रस्त्यांवर आम्ही एक हजार कोटी रुपये खर्च केले, ते तरी द्या.
- नरेंद्र मोदी व नितिन गडकरी यांनी हजारो कोटींच्या नुसत्या घोषणा केल्या नी लाखोंच्या नोक-या निर्माण करण्याचं आश्वासन देतायत, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे... बिहारच्या नुसत्या बोली लावत आहेत, सध्याची बोली सव्वा लाख कोटी रुपयांची आहे.
- केंद्र सरकारला बिहारच्या विकासासाठी आम्ही सविस्तर रोडमॅप दिला होता, ब-यापैकी आम्ही कामही सुरू केलं, भरपूर पैसे खर्चही केले परंतु केंद्राकडून पैसेच येत नसल्याची टीका नितिश कुमारांनी केली.
- आधीपासून अस्तित्वात असलेल्या योजनाच पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाविष्ट केल्याचे सांगत एकही कोंबडी कितनी बार हलाल करोगे असं विचारत नितिश कुमारांनी मोदींची खिल्ली उडवली.
-  हे बिहार आहे, गुजरात नाही... विसरू नका. 
- बिहारमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करत असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. वीज पुरवठ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे, याबाबत बिहारच्या जनतेला सर्व ठावूक आहे.
- एकीकडे को-ऑपरेटिव्ह फेडरलीझमचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे राज्यांना याचकासारखी वागणूक द्यायची ही दुटप्पी वागणूक चुकीची आहे.
- केवळ आर्थिक पॅकेजवर आम्ही संतुष्ट नाही तर विशेष राज्याचा दर्जा बिहारला हवा आहे.
- बिहारमध्ये गैरभाजपाचं सरकार असलेलं पंतप्रधानांना सहन होत नाही आहे.
- बिहारच्या वाट्याचं जे आहे ते बिहारला मिळायलाच पाहिजे. 
- विशेष पॅकेज हा आमचा हक्क आहे, उपकार नाही. 
- पॅकेज दिले म्हणजे असे वाटले की मोदी बिहारची बोली लावत आहेत.