शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

बेरोजगारीमुळे गेल्या 3 वर्षात किती लोकांच्या आत्महत्या? मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:06 IST

Parliament : देशात मागील तीन वर्षाच्या काळात अनेकांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

नवी दिल्ली : देशात बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशात मागील तीन वर्षाच्या काळात अनेकांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, तर 9,140 लोकांनी बेरोजगारीमुळे आपला जीव गमवला आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, 2020 मध्ये 3,548 लोकांनी तर 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या. याचबरोबर, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. 

नित्यानंद राय म्हणाले की, 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या, तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्या. तसेच, सरकार मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले.  

विरोधकांकडून बेरोजगारीचा मुद्दा उपस्थितसंसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विविध विरोधी खासदारांनी बेरोजगारीचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. यावेळी विरोधकांनी आरोप केला आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर असलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात फारच कमी तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदUnemploymentबेरोजगारी