शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:05 IST

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.

नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५0 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्याच पक्षाचे उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, भारत कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला, असे म्हटले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याविषयी भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही परदेशी वृत्तपत्रांचा हवाला देत किती दहशतवादी मारले गेले, ही माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली होती.तोच प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिबल व दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. वॉशिंग्टन फोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ, रॉयटर्सच्या बातम्यांचा हवाला देत मोदी यांना सवाल केला की, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे द्यावेत. बालाकोट येथे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे कोठेही दिसत नाही.त्यावर भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, असे पुरावे मागणे म्हणजे आपल्या हवाई दलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक