शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात कचरा निघतो किती आयुक्तांना पडला प्रश्न: सर्वेक्षणाची गरज स्वच्छतेची ऐशीतैशी:भाग?1

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.
समीक्षाने काम बंद केल्यावर जानेवारी 2015 पासून महापालिकेने पूर्वीप्रमाणेच स्वबळावर कचरा उचलण्याचा निर्णय घेतला. पण या कामाचे नियोजन अद्याप जमले नाही. विभागनिहाय आठ ठेकेदार नेमून कचरा उचलला जात आहे. वजनावर ठेकेदारांना पैसे दिले जात आहेत. लाखो रुपये खचरूनही शहरातील घाण हटलेली नाही. पावसाळ्याचे दिवस व रस्त्यावर कचरा साठल्याने रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे आयुक्त काळम-पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले असले तरी त्यांनाही नेमकी माहिती दिली जात नाही. शहरात दररोज 350 टन कचरा निघतो व त्यापैकी 250 टन कचरा उचलला जातो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दररोज उरलेल्या 100 टन कचर्‍याचे काय होते असा प्रश्न खुद्द आयुक्तांना पडला आहे. असे झाले तर आत्तापर्यंत सर्वत्र कचरा साठून राहायला हवा होता. कचरा नेमका निघतो किती यावर अभ्यास करण्यासाठी कचर्‍यापासून वीज निर्मिती करणार्‍या ठेकेदाराला सुचित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे व्यवस्थित परीक्षण होत नसल्याने कचरा गोळा करण्यात गडबडी होत आहेत. घंटागाड्या आहेत पण पूर्वीसारखे त्यांच्याकडून काम होत नसल्याचे दिसून आले आहे. आयुक्तांनी मायक्रो प्लॅनिंग करूनही ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावत नाहीत. ठराविक ठिकाणी या गाड्या जात असल्याचे दिसून आले आहे.
ठेकेदारांची बनवाबनवी
आठ ठेकेदारांमार्फत शहरातील कचरा उचलला जातो. ठेकेदार जेसीबीद्वारे कचरा उचलतात. यामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कचर्‍यात माती जाते व पर्यायाने कचर्‍याचे वजन वाढते. काट्यावर वजन करण्यासाठी गाडी नेण्यापूर्वी ठेकेदार गाडीत पाणी ओतत असल्याचा प्रकार उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी उघडकीस आणला आहे.