शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

'एकाचवेळी गांधी-गोडसे सोबत कसकाय चालू शकतात '

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:55 IST

जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.

नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार आणि जनता दल युनायटेडचे माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आगामी काळासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बिहारमध्ये अस्तित्वात असलेल्या भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची विचारधारा एकत्र कसकाय चालू शकते, असा सवाल किशोर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्यासाठी पितातुल्य आहेत. त्यांनी मला मुलासारखी वागणूक दिली. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. त्यांनी मला पक्षातून काढले त्यावर आपण नाराज नाही. यावेळी त्यांनी आपला आगामी कार्यक्रम घोषीत केला. येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून 'बात बिहार की' हे अभियान ते सुरू करणार आहेत.

या अभियानासाठी बिहारमधील 8 हजारहून अधिक गावांमधील नागरिकांना निवडण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात बिहार आघाडीच्या 10 राज्यांमध्ये असावे, असा विचार करणाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र एखाद्या राष्ट्रीय पक्षासोबत जाणार का, यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

दरम्यान भाजप-जदयू युतीवर त्यांनी हल्लाबोल केला. महत्मा गांधी आणि गोडसे यांची विचारधार भिन्न आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र चालू शकत नाही, असा टोला त्यांनी जदयू-भाजप युतीला लगावला आहे. तसेच जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.