शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'एकाचवेळी गांधी-गोडसे सोबत कसकाय चालू शकतात '

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:55 IST

जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.

नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार आणि जनता दल युनायटेडचे माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आगामी काळासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बिहारमध्ये अस्तित्वात असलेल्या भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची विचारधारा एकत्र कसकाय चालू शकते, असा सवाल किशोर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्यासाठी पितातुल्य आहेत. त्यांनी मला मुलासारखी वागणूक दिली. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. त्यांनी मला पक्षातून काढले त्यावर आपण नाराज नाही. यावेळी त्यांनी आपला आगामी कार्यक्रम घोषीत केला. येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून 'बात बिहार की' हे अभियान ते सुरू करणार आहेत.

या अभियानासाठी बिहारमधील 8 हजारहून अधिक गावांमधील नागरिकांना निवडण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात बिहार आघाडीच्या 10 राज्यांमध्ये असावे, असा विचार करणाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र एखाद्या राष्ट्रीय पक्षासोबत जाणार का, यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

दरम्यान भाजप-जदयू युतीवर त्यांनी हल्लाबोल केला. महत्मा गांधी आणि गोडसे यांची विचारधार भिन्न आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र चालू शकत नाही, असा टोला त्यांनी जदयू-भाजप युतीला लगावला आहे. तसेच जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.