शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 06:32 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

-आदेश रावलनवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये प्रौढ नागरिकांच्या संख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदारांची भर कशी काय घालण्यात आली, असे प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत उपस्थित केले. वाढीव मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाने उत्तर न दिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही गांधी यांनी दिला.

राहुल म्हणाले की, हा आरोप नाही. आकड्यांवर आधारित वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या पाहिली तर ती हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी सर्वांना उपलब्ध करून द्यावी. म्हणजे या विषयातील सर्व मुद्दे स्पष्ट होतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी ज्या मतदारांची नोंदणी झाली त्यातील बहुतांश लोकांनी भाजपला मतदान केले. कारण विरोधी पक्षांनी आपला मतदानाचा टक्का कायम राखण्यात यश मिळविले. त्यावरून आम्ही हा निष्कर्ष काढला आहे.शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत हेही पत्रपरिषदेला उपस्थित होते. राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने दिली पाहिजेत. अन्यथा आयोग केंद्र सरकारचा गुलाम आहे अशी प्रतिमा तयार होईल.

पाच वर्षांत ३२ लाख, अन् पाचच महिन्यांत ३९ लाख

सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढ व्यक्तींची संख्या ९.५४ कोटी आहे, तर मतदारसंख्या ९.७ कोटी आहे. येथे मतदारांची संख्या अधिक आहे. ही संख्या कशी वाढली याचेच आम्हाला उत्तर हवे आहे. लोकसभा निवडणुकांनंतर पाचच महिन्यांत महाराष्ट्रात ३९ लाख मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. त्याआधी २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत महाराष्ट्रामध्ये ३२ लाख मतदारांची नावे नोंदविली गेली.

निवडणूक आयोग म्हणतो, प्रत्येक प्रश्नाचे लेखी उत्तर देणार

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे लेखी स्वरूपात, तसेच आकडेवारीसह सविस्तर उत्तर दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी म्हटले आहे. निवडणूक आयोग राजकीय पक्ष, मतदार या सर्वांनी केलेल्या सूचनांची, उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतो. मतदारांची नावे नोंदण्याची समान पद्धती देशभर राबविली आहे, असेही आयोगाने म्हटले.

लक्ष भरकटवण्याचे काम

राहुल गांधी यांच्या आरोपांचे उत्तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेले आहे. किती मतदार महाराष्ट्रात वाढले, कसे वाढले हेही आयोगाने सांगितले आहे. आता राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते दिल्लीत काँग्रेसचा उद्याच्या निकालात दारुण पराभव होणार असल्याने ते लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत. ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढत राहतील तोवर जनतेचे समर्थन त्यांना कधीही मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahavikas Aghadiमहाविकास आघाडी