शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दूषित रक्तामुळे देशात २,२३४ जणांना एचआयव्ही; महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:54 IST

दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत.

नवी दिल्ली : दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. रुग्णालयांतील असुरक्षित रक्त संक्रमण पद्धत याला कारणीभूत आहे. गेल्या आठवड्यातीलच आसामचे उदाहरण आहे. भाजल्यामुळे कामरूप जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलाला गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूषित रक्त दिले गेल्यामुळे त्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला. दूषित रक्तामुळे रुग्णांना एचआयव्ही होण्याच्या घटनांमध्ये गुजरात दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांत अशा अनुक्रमे २९२ व २७६ घटना घडल्या आहेत. राजधानी दिल्लीही यातून सुटली नाही. दिल्लीत २६४ जणांना असुरक्षित रक्ताचा फटका बसला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी अर्जानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (नॅको) ही माहिती उघड केली. अर्थसंकल्पीय कात्रीमुळे एड्स जनजागृतीबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही जबाबदार रुग्णालये आणि रक्तपेढ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे कोठारी म्हणाले. देशभरातील सुरक्षित रक्त संक्रमणाची जबाबदारी नॅकोवर आहे. रक्तदाता व त्याच्याकडून मिळालेल्या रक्ताची चाचणी करून ते एचआयव्ही, एचबीव्ही, हेपटायटिस सी, मलेरिया वा सिफिलीस यासारख्या संसर्गजन्य रोगाने संक्रमित नसल्याची खात्री करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा प्रसारगोयल म्हणाले की, दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण होण्याच्या घटना दुर्दैवी असून, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. आमच्या एचआयव्ही कार्यक्रमाचे प्रमाण डोळ्यासमोर ठेवून ताज्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला गेल्यास आम्ही किती काम केले याचा प्रत्यय येईल. उदाहरणार्थ, २० वर्षांपूर्वी एकूण एचआयव्ही संसर्गाच्या आठ ते दहा टक्के संसर्ग हा रक्त संक्रमणातून होत असे. आता हे प्रमाण एक टक्क्यावर आले आहे. आम्ही रक्तातून होणाऱ्या संसर्गाला अटकाव केला आहे. गरजू रुग्णाला रक्त देण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आम्ही सर्व रक्तपेढ्यांना कायद्याने बंधनकारक केले आहे. 2015 च्या नॅकोच्या वार्षिक अहवालानुसार, २०११ मध्ये भारतातील एचआयव्ही/ एड्सबाधीतांची संख्या २०.९ लाख होती. यातील ८६ टक्के रुग्ण हे १५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते, तर सात टक्के रुग्ण पंधरा वर्षांहून कमी वयाची मुले होती. २०११ मध्ये एचआयव्ही/ एड्सबाधित मुलांची संख्या सुमारे १.४५ लाख, तर महिलांची संऱ्या ८.१६ लाख म्हणजेच ३९ टक्के होती.काही प्रकरणांत दाता कदाचित विंडो पिरियडमध्ये (रोगाची लागण स्पष्ट न होऊ शकण्याचा कालावधी) असू शकतो. विंडो पिरियड असताना दात्याने रक्तदान केल्यास त्याची रक्तचाचणी निगेटिव्ह (संसर्ग नाही) येते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित रक्तदाता आणि त्याने दिलेले रक्त संक्रमित असते, असे गोयल म्हणाले. ताज्या वार्षिक अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ पर्यंत नॅकोने एकूण ३० लाख युनिट एवढे रक्तसंकलन केले. यापैकी ८४ टक्के रक्त हे स्वयंसेवी रक्तदानातून आलेले असून येथेच खरी समस्या असल्याचे दिसते, असे नॅकोचे उपमहासंचालक नरेश गोयल यांनी सांगितले.