शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दूषित रक्तामुळे देशात २,२३४ जणांना एचआयव्ही; महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:54 IST

दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत.

नवी दिल्ली : दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. रुग्णालयांतील असुरक्षित रक्त संक्रमण पद्धत याला कारणीभूत आहे. गेल्या आठवड्यातीलच आसामचे उदाहरण आहे. भाजल्यामुळे कामरूप जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलाला गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूषित रक्त दिले गेल्यामुळे त्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला. दूषित रक्तामुळे रुग्णांना एचआयव्ही होण्याच्या घटनांमध्ये गुजरात दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांत अशा अनुक्रमे २९२ व २७६ घटना घडल्या आहेत. राजधानी दिल्लीही यातून सुटली नाही. दिल्लीत २६४ जणांना असुरक्षित रक्ताचा फटका बसला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी अर्जानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (नॅको) ही माहिती उघड केली. अर्थसंकल्पीय कात्रीमुळे एड्स जनजागृतीबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही जबाबदार रुग्णालये आणि रक्तपेढ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे कोठारी म्हणाले. देशभरातील सुरक्षित रक्त संक्रमणाची जबाबदारी नॅकोवर आहे. रक्तदाता व त्याच्याकडून मिळालेल्या रक्ताची चाचणी करून ते एचआयव्ही, एचबीव्ही, हेपटायटिस सी, मलेरिया वा सिफिलीस यासारख्या संसर्गजन्य रोगाने संक्रमित नसल्याची खात्री करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा प्रसारगोयल म्हणाले की, दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण होण्याच्या घटना दुर्दैवी असून, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. आमच्या एचआयव्ही कार्यक्रमाचे प्रमाण डोळ्यासमोर ठेवून ताज्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला गेल्यास आम्ही किती काम केले याचा प्रत्यय येईल. उदाहरणार्थ, २० वर्षांपूर्वी एकूण एचआयव्ही संसर्गाच्या आठ ते दहा टक्के संसर्ग हा रक्त संक्रमणातून होत असे. आता हे प्रमाण एक टक्क्यावर आले आहे. आम्ही रक्तातून होणाऱ्या संसर्गाला अटकाव केला आहे. गरजू रुग्णाला रक्त देण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आम्ही सर्व रक्तपेढ्यांना कायद्याने बंधनकारक केले आहे. 2015 च्या नॅकोच्या वार्षिक अहवालानुसार, २०११ मध्ये भारतातील एचआयव्ही/ एड्सबाधीतांची संख्या २०.९ लाख होती. यातील ८६ टक्के रुग्ण हे १५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते, तर सात टक्के रुग्ण पंधरा वर्षांहून कमी वयाची मुले होती. २०११ मध्ये एचआयव्ही/ एड्सबाधित मुलांची संख्या सुमारे १.४५ लाख, तर महिलांची संऱ्या ८.१६ लाख म्हणजेच ३९ टक्के होती.काही प्रकरणांत दाता कदाचित विंडो पिरियडमध्ये (रोगाची लागण स्पष्ट न होऊ शकण्याचा कालावधी) असू शकतो. विंडो पिरियड असताना दात्याने रक्तदान केल्यास त्याची रक्तचाचणी निगेटिव्ह (संसर्ग नाही) येते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित रक्तदाता आणि त्याने दिलेले रक्त संक्रमित असते, असे गोयल म्हणाले. ताज्या वार्षिक अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ पर्यंत नॅकोने एकूण ३० लाख युनिट एवढे रक्तसंकलन केले. यापैकी ८४ टक्के रक्त हे स्वयंसेवी रक्तदानातून आलेले असून येथेच खरी समस्या असल्याचे दिसते, असे नॅकोचे उपमहासंचालक नरेश गोयल यांनी सांगितले.