शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांना आठवड्याला मिळणार ३ दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 17:24 IST

कर्मचाऱ्यांच्या एकूण कामकाजाच्या वेळेत कुठेही बदल केला नाही. कर्मचाऱ्याला आठवड्याला ४८ तास काम करावे लागेल असं विधेयकात म्हटलं आहे.

नवी दिल्ली - एकीकडे देशात बहुतांश कंपनीत सध्या २ दिवस सुट्टीही मिळत नाही. तर दुसरीकडे तामिळनाडू सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तामिळनाडू विधानसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार आता राज्यात कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४ दिवस काम अन् ३ दिवस आराम मिळणार आहे. सरकारच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईही होणार आहे. 

तामिळनाडू सरकारने दावा केलाय की, कर्मचाऱ्यांच्या एकूण कामकाजाच्या वेळेत कुठेही बदल केला नाही. कर्मचाऱ्याला आठवड्याला ४८ तास काम करावे लागेल. शुक्रवारी फॅक्टरी अधिनियम २०२३ हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या विधेयकाला विरोधकांनी विरोधही केला. हे विधेयक पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दरदिवशी ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल असा आक्षेप घेण्यात आला. 

उद्योगमंत्री थंगम थेनारासु म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या आठवड्याच्या कामकाज वेळेत बदल होणार नाही. परंतु कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा पर्याय या विधेयकात आहे. महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. सुट्टी, वेतन, ओव्हरटाईम या नियमात बदल होणार नाहीत. ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरोधात त्यांना काम करण्यास भाग पाडतील अशा कंपन्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं. 

१२ तासांची शिफ्ट, ४८ तास कामहे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असले तरी काही नियमांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत. कारखाने आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शिफ्ट टाइम १२ तासांपर्यंत वाढवण्यात येईल असं या विधेयकात म्हटले आहे. त्याच वेळी, संपूर्ण आठवड्यात ४८ तास काम केले जाईल. जे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल. विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व कारखाने आणि कंपन्या हा नियम लागू करू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हा नियम प्रत्येकाने पाळणे बंधनकारक असेल असं विधेयक मंजूर करताना सरकारने म्हटले आहे. डिएमकेच्या बहुमताशिवाय मरुमलार्ची द्रविंड मुनेत्र कडंगम(एमडिएमके) यांच्यासह अन्य पक्षानेही विधेयकाचे समर्थन केले.