शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांना आठवड्याला मिळणार ३ दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 17:24 IST

कर्मचाऱ्यांच्या एकूण कामकाजाच्या वेळेत कुठेही बदल केला नाही. कर्मचाऱ्याला आठवड्याला ४८ तास काम करावे लागेल असं विधेयकात म्हटलं आहे.

नवी दिल्ली - एकीकडे देशात बहुतांश कंपनीत सध्या २ दिवस सुट्टीही मिळत नाही. तर दुसरीकडे तामिळनाडू सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तामिळनाडू विधानसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार आता राज्यात कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४ दिवस काम अन् ३ दिवस आराम मिळणार आहे. सरकारच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईही होणार आहे. 

तामिळनाडू सरकारने दावा केलाय की, कर्मचाऱ्यांच्या एकूण कामकाजाच्या वेळेत कुठेही बदल केला नाही. कर्मचाऱ्याला आठवड्याला ४८ तास काम करावे लागेल. शुक्रवारी फॅक्टरी अधिनियम २०२३ हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या विधेयकाला विरोधकांनी विरोधही केला. हे विधेयक पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दरदिवशी ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल असा आक्षेप घेण्यात आला. 

उद्योगमंत्री थंगम थेनारासु म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या आठवड्याच्या कामकाज वेळेत बदल होणार नाही. परंतु कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा पर्याय या विधेयकात आहे. महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. सुट्टी, वेतन, ओव्हरटाईम या नियमात बदल होणार नाहीत. ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरोधात त्यांना काम करण्यास भाग पाडतील अशा कंपन्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं. 

१२ तासांची शिफ्ट, ४८ तास कामहे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असले तरी काही नियमांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत. कारखाने आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शिफ्ट टाइम १२ तासांपर्यंत वाढवण्यात येईल असं या विधेयकात म्हटले आहे. त्याच वेळी, संपूर्ण आठवड्यात ४८ तास काम केले जाईल. जे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल. विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व कारखाने आणि कंपन्या हा नियम लागू करू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हा नियम प्रत्येकाने पाळणे बंधनकारक असेल असं विधेयक मंजूर करताना सरकारने म्हटले आहे. डिएमकेच्या बहुमताशिवाय मरुमलार्ची द्रविंड मुनेत्र कडंगम(एमडिएमके) यांच्यासह अन्य पक्षानेही विधेयकाचे समर्थन केले.