शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्व हा धर्म नाही, जगण्याचा मार्ग - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 25, 2016 16:25 IST

हिंदुत्व हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, तो धर्म नाही या १९९५ साली दिलेल्या निर्णयावर पुन्हा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २५ - हिंदुत्व हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, तो धर्म नाही या १९९५ साली दिलेल्या निर्णयावर पुन्हा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाचा धर्माशी संबंध नसल्याचेच स्पष्ट केले आहे.
 
हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. पुढच्या वर्षी होणा-या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर करण्यावर बंदी घालावी अशीही त्यांनी याचिकेतून मागणी केली होती. तिस्ता सेटलवाड यांच्या याचिकेवर हिंदूत्व किंवा हिंदू धर्म आदी विषयावर सुनावणी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. 
 
धार्मिक नेत्याने आपल्या अनुयायांना विशिष्ट उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करणे, जनप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १२३ (३) नुसार बेकायदेशीर आहे का, हा मूळ विषय आहे. त्यामुळे या संदर्भातील कायदेशीर वैधता इतक्यापुरताच सुनावणीचा विषय मर्यादीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. कलम १२३ (३) अंतर्गत उमेदवार किंवा त्याच्यावतीने कोणीही नागरिकांमध्ये धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारावर शत्रूत्वाची भावना निर्माण करत असेल तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
 
१९९०च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या दोन भाषणांचा प्रचारासाठी वापर केला होता. हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्राच्या आधारावर त्यांनी मते मागितली होती त्यामुळे सदर उमेदवारांची निवडणूक रद्द करण्याची याचिका करण्यात आली होती. शिवसेना-भाजपच्या अनेक विजयी उमेदवारांविरोधात त्यावेळी खटले दाखल झाले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजुने निकाल दिला होता.
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर दोन प्रकरणे वगळता अन्य सर्व प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. तर या दोनपैकी एक याचिका बरखास्त करण्यात आली तर एक प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी राजकारण्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.