शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अखंड हिंदुस्थानचा पहिला नारा मराठ्यांचा - डॉ. सदानंद मोरे

By admin | Updated: April 3, 2015 18:26 IST

अहमदशाह अब्दालीचा तहाचा प्रस्ताव धुडकावत शीखांच्या सहकार्याने उत्तर भारतात युद्धाला उभे ठाकलेले मराठे हे अखंड हिंदुस्थानचे पहिले पुरस्कर्ते होते

ऑनलाइन लोकमत 
घुमान (पंजाब ), दि. ३ - अहमदशाह अब्दालीचा तहाचा प्रस्ताव धुडकावत शीखांच्या सहकार्याने उत्तर भारतात युद्धाला उभे ठाकलेले मराठे हे अखंड हिंदुस्थानचे पहिले पुरस्कर्ते होते असे ठामपणे घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यश्र सदानंद मोरे यांनी सांगितले. पंजाबपर्यंतच्या प्रांतावर अब्दालीचे राज्य राहील आणि त्या पलीकडच्या भागावर मराठ्यांनी राज्य करावे असा प्रस्ताव अब्दालीने मराठ्यांना दिला होता. परंतु हिंदुस्थानची सीमा कंदाहार - काबूलपर्यंत असल्याचे सांगत मराठ्यांनी तह केला नाही आणि भारतातल्या सगळ्या जाती - धर्माच्या राज्यांना घेत अब्दालीचा मुकाबला करण्याची तयारी केल्याचे मोरे म्हणाले. या युद्धामध्ये शीखांनी मराठ्य़ांना साथ दिल्याचे सांगताना मोरे यांनी शीख धर्म स्थापन होण्यापूर्वीपासून नामदेवांच्या माध्यमातून पंजाब व महाराष्ट्र यांच्या सहकार्याला सुरूवात झाली होती असे प्रतिपादन मोरे यांनी केले. नामदेवांचे अभंग गुरू ग्रंथसाहिबमध्ये येतात कारण त्याआधी शेकडो वर्षे नामदेवांनी पंजाबचं व महाराष्ट्राचं नातं जोडलेलं असतं असं मोरे सांगतात.
त्यामुळे देश स्वतंत्र होण्याअगोदरपासून महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये जिव्हाळयाचे संबंध होते आणि महाराष्ट्र पंजाबचे तर पंजाब महाराष्ट्राचे रक्षण करताना अनेकांनी पाहिले आहे, असे ते म्हणाले. अनेक दाखले देत मराठे - शीख यांच्या मैत्रीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे आजपासून ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठया थाटात प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सदानंद मोरे बोलत होते.  संमेलनाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमधील अनेक बाबतीत साम्य असून या दोन राज्यांमध्ये शेकडो वर्षापासून मैत्री चालत आलेली आहे. ज्यावेळी साहित्य संमेलन घुमानला घ्यायचं ठरलं त्यावेळी अनेकांनी प्रश्न विचारला की, महाराष्ट्र सोडून तुम्ही घुमानला संमेलन का घेतायत? त्यावर मी अनेकांना विचारले की, घुमानला साहित्य संमेलन घ्यायचं नाही तर कुठं घ्यायचं? असं विचारल्यावर विचारणा-याकडे याचे उत्तर नाही मिळाले. संमेलनांच्या ठिकाणावरुन जी चर्चा झाली ती अनाठायी आहे असे सांगून डॉ. मोरे म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनांसाठी देशात घुमान सारखे ठिकाण अन्य कुठेही नाही. नामदेवाची प्रेरणा ही प्रांत व धर्माच्या पलिकडची आहे. पंजाब-महाराष्ट्राचे नाते हे ऐतिहासिक व प्रेरणादायक असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.
संमेलानाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या शरद पवार यांनी घुमानला साहित्य संमेलन ठेवले ते योग्यच असून संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली ती यथोचित असल्याचे म्हटले. मुंबई, पुणे, नागपूरला मराठी टक्का घसरतोय अशी आठवण करुन देतानाच मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा अशी मागणी केली. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घुमानला साहित्य संमेलन भरवल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे आभार मानले. घुमानसाठी चौपदरी रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल अशी घोषणाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी केली.