शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 14:19 IST

भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत.

मुंबई - भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत. पण गेल्या चार वर्षांमध्ये भाजपाने नेडाचा (नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट) प्रयोग करत काही ठिकाणी स्वबळावर तर काही राज्यांत आघाडी करत ईशान्य भारतात काँग्रेसला सत्तेतून दूर केले आहे. या सर्व 'नेडा'प्रयोगामागे एकच यंत्र आहे ते म्हणजे हेमंतो बिस्वा सर्मा. एकेकाळी काँग्रेसला सत्ता समीकरण जुळवायला, आसाममधील सर्व सत्ताप्रश्नात मदत करणारा हा प्रभावी तरुण नेता भारतीय जनता पक्षाच्या गोटात आला आणि भाजपाला ईशान्येत अच्छे दिन आले. मार्च 2010 साली झालेल्या आसामातून राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला काही मतं कमी पडत होती. या दोन उमेदवारांना विजयी करण्याचं काम एका आसामी नेत्याकडे सोपविण्यात आलं. तो नेता होता हेमंतो बिस्वा सर्मा.

मतदानाच्या दिवशी हेमंतो स्वतःच भाजपाच्या 4 आमदारांना आपल्या गाडीतून घेऊन विधानसभेत आले तेव्हा सर्वांना निकाल समजलाच होता. काँग्रेसचे नझनीन फारक आणि सिल्वियन कोंडापन अनुक्रमे 43 आणि 42 मते घेऊन विजयी झाले तर संयुक्त विरोधीपक्षाच्या उमेदवारांना 40 मते पडली होती. यानंतर भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारांसमोर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली होती. ज्या राज्यातून पंतप्रधान(तत्कालीन) डॉ. मनमोहन सिंह विजयी होतात त्या राज्यात काँग्रेसचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री लोकशाहीचा खून करतात, अशी जबरदस्त टीका त्यांनी केली होती. पण मार्च 2010 आणि मार्च 2018 या दोन महिन्यांमध्ये बराच फरक आहे. हेच सर्मा आता भाजपाच्या गोटात आहेत आणि साम दाम दंड भेद असे सगळे उपाय करुन काँग्रेसला पराभूत करत आहेत. 

हेमंतो यांचा राजकारणाशी संबंध अत्यंत लहान वयापासून आला. सहाव्या इयत्तेत शिकत असताना ते ऑल आसाम स्टुडंटस युनियन म्हणजे 'आसू'चे काम करू लागले. प्रचारपत्रक पोहोचवण्यासारख्या कामांपासून त्यांनी आपल्या कामाला शाळेतूनच सुरुवात केली. 1993 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1996 मध्ये सर्मा जालकबरीमधून पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या विधानसभेच्या सुरुवातीच्या काळात ते मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे उजवा हात मानावेत इतक्या जवळ होते. मात्र 2012पासून गोगोई आणि सर्मा यांच्यात दुही निर्माण झाली. ही अविश्वास आणि विरोधाची दरी दिवसेंदिवस वाढतच गेली.

 

2015 साली आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई, काँग्रेस नेते सी. पी. जोशी यांच्यासह आसामच्या विविध प्रश्नांवर भेटण्यासाठी ते राहुल गांधी यांच्याकडे गेले. मात्र त्यावेळेस राहुल यांचे सर्व लक्ष त्यांच्या पाळीव कुत्र्याकडेच होते असे ते सांगतात. बैठकीत एका वेळेस तर सी. पी . जोशी आणि गोगोई यांच्यात मोठा वाद झाला तरीही राहुल शांत राहून कुत्र्याशी खेळत राहिले. या कुत्र्याने पाहुण्यांसाठी ठेवलेल्या बिस्किटातील बिस्कीट उचलल्यावरही राहुल शांत राहून हसत होते असे हेमंतो सांगतात. त्याचवेळेस त्यांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला. ही बिस्किटांची गोष्ट सर्मा आजही सर्वांना वारंवार सांगतात.

आसामच्या पक्षस्थितीबाबत नेतृत्व गंभीर नसल्याचे दिसताच ते भाजपामध्ये आले आणि इथे भाजपाला अच्छे दिन आले. आसामध्ये भरघोस यश मिळाल्यावर मणिपूर आणि त्रिपुरा विजय त्यांनी नेडाच्या माध्यमातून मिळवला. मेघालयात सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला सत्तेतून दूर करत कॉनराड यांना नोडाच्या गोटात आणून पाठिंबा दिला. असे एकेक राज्य त्यांनी भाजपाच्या खात्यात ओढून घेतले आहे. 

भाजपात आल्यावर त्यांना विविध जबाबदा-या मिळाल्या. नेडाचे समन्वयक पद तर मिळालेच त्याहून आसाममध्ये अर्थ, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली गेली आहेत. आसामचे मुख्यमंत्रिपद सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे असले तरी सर्मा हे दुसरं सत्ताकेंद्रच मानलं जातं.

 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018