शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 14:19 IST

भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत.

मुंबई - भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत. पण गेल्या चार वर्षांमध्ये भाजपाने नेडाचा (नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट) प्रयोग करत काही ठिकाणी स्वबळावर तर काही राज्यांत आघाडी करत ईशान्य भारतात काँग्रेसला सत्तेतून दूर केले आहे. या सर्व 'नेडा'प्रयोगामागे एकच यंत्र आहे ते म्हणजे हेमंतो बिस्वा सर्मा. एकेकाळी काँग्रेसला सत्ता समीकरण जुळवायला, आसाममधील सर्व सत्ताप्रश्नात मदत करणारा हा प्रभावी तरुण नेता भारतीय जनता पक्षाच्या गोटात आला आणि भाजपाला ईशान्येत अच्छे दिन आले. मार्च 2010 साली झालेल्या आसामातून राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला काही मतं कमी पडत होती. या दोन उमेदवारांना विजयी करण्याचं काम एका आसामी नेत्याकडे सोपविण्यात आलं. तो नेता होता हेमंतो बिस्वा सर्मा.

मतदानाच्या दिवशी हेमंतो स्वतःच भाजपाच्या 4 आमदारांना आपल्या गाडीतून घेऊन विधानसभेत आले तेव्हा सर्वांना निकाल समजलाच होता. काँग्रेसचे नझनीन फारक आणि सिल्वियन कोंडापन अनुक्रमे 43 आणि 42 मते घेऊन विजयी झाले तर संयुक्त विरोधीपक्षाच्या उमेदवारांना 40 मते पडली होती. यानंतर भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारांसमोर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली होती. ज्या राज्यातून पंतप्रधान(तत्कालीन) डॉ. मनमोहन सिंह विजयी होतात त्या राज्यात काँग्रेसचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री लोकशाहीचा खून करतात, अशी जबरदस्त टीका त्यांनी केली होती. पण मार्च 2010 आणि मार्च 2018 या दोन महिन्यांमध्ये बराच फरक आहे. हेच सर्मा आता भाजपाच्या गोटात आहेत आणि साम दाम दंड भेद असे सगळे उपाय करुन काँग्रेसला पराभूत करत आहेत. 

हेमंतो यांचा राजकारणाशी संबंध अत्यंत लहान वयापासून आला. सहाव्या इयत्तेत शिकत असताना ते ऑल आसाम स्टुडंटस युनियन म्हणजे 'आसू'चे काम करू लागले. प्रचारपत्रक पोहोचवण्यासारख्या कामांपासून त्यांनी आपल्या कामाला शाळेतूनच सुरुवात केली. 1993 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1996 मध्ये सर्मा जालकबरीमधून पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या विधानसभेच्या सुरुवातीच्या काळात ते मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे उजवा हात मानावेत इतक्या जवळ होते. मात्र 2012पासून गोगोई आणि सर्मा यांच्यात दुही निर्माण झाली. ही अविश्वास आणि विरोधाची दरी दिवसेंदिवस वाढतच गेली.

 

2015 साली आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई, काँग्रेस नेते सी. पी. जोशी यांच्यासह आसामच्या विविध प्रश्नांवर भेटण्यासाठी ते राहुल गांधी यांच्याकडे गेले. मात्र त्यावेळेस राहुल यांचे सर्व लक्ष त्यांच्या पाळीव कुत्र्याकडेच होते असे ते सांगतात. बैठकीत एका वेळेस तर सी. पी . जोशी आणि गोगोई यांच्यात मोठा वाद झाला तरीही राहुल शांत राहून कुत्र्याशी खेळत राहिले. या कुत्र्याने पाहुण्यांसाठी ठेवलेल्या बिस्किटातील बिस्कीट उचलल्यावरही राहुल शांत राहून हसत होते असे हेमंतो सांगतात. त्याचवेळेस त्यांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला. ही बिस्किटांची गोष्ट सर्मा आजही सर्वांना वारंवार सांगतात.

आसामच्या पक्षस्थितीबाबत नेतृत्व गंभीर नसल्याचे दिसताच ते भाजपामध्ये आले आणि इथे भाजपाला अच्छे दिन आले. आसामध्ये भरघोस यश मिळाल्यावर मणिपूर आणि त्रिपुरा विजय त्यांनी नेडाच्या माध्यमातून मिळवला. मेघालयात सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला सत्तेतून दूर करत कॉनराड यांना नोडाच्या गोटात आणून पाठिंबा दिला. असे एकेक राज्य त्यांनी भाजपाच्या खात्यात ओढून घेतले आहे. 

भाजपात आल्यावर त्यांना विविध जबाबदा-या मिळाल्या. नेडाचे समन्वयक पद तर मिळालेच त्याहून आसाममध्ये अर्थ, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली गेली आहेत. आसामचे मुख्यमंत्रिपद सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे असले तरी सर्मा हे दुसरं सत्ताकेंद्रच मानलं जातं.

 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018