शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अटल बोगद्याचा फलक  सरकार पुन्हा लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:40 IST

सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला.

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी २८ जून २०१० रोजी ज्या अटल बोगद्याची पायाभरणी केली होती, त्याचा फलक आता पुन्हा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू म्हणाले की, हा फलक गहाळ आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. तो लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे. संबंधित विभागाला या निर्णयाचे पुनरावलोकन करून मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडण्यास सांगितले आहे. आगामी काही दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हा ९.०२ किमीचा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने बांधला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी यांनी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिक्खू यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे पुत्र विक्रमादित्य हेही उपस्थित होते. 

प्रकरण काय?३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन झाले होते. या वेळी प्रदेश काँग्रेसने असा आरोप केला होता की, सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये पायाभरणी झाली होती, त्याचा फलक काढून टाकण्यात आला.सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये झालेल्या पायाभरणी समारंभास तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह यांची उपस्थिती होती.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश