शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

महामार्ग विकासकांना भरपाई

By admin | Updated: November 19, 2015 03:39 IST

महामार्ग प्रकल्पांमध्ये अडचणी आल्यास आणि विकासकाकडून विलंब झालेला नसल्यास करार केलेल्या कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय)

नवी दिल्ली : महामार्ग प्रकल्पांमध्ये अडचणी आल्यास आणि विकासकाकडून विलंब झालेला नसल्यास करार केलेल्या कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. रखडलेले ३४ महामार्ग प्रकल्प मार्गी लावण्यास सरकारच्या या निर्णयाचा लाभ होईल, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. प्रत्येक प्रकरणाचे गुण-दोष विचारात घेऊन त्याआधारे नुकसानभरपाई देण्यासाठी प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपविणे हा धाडसी निर्णय आहे. प्रकल्पाच्या विलंबाला विकासक जबाबदार नसतील तर आवश्यकता भासल्यास टोल लावण्याचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे टोल प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून त्यांच्याकडे संचालनालयाची जबाबदारी सोपविली जाईल. या निर्णयामुळे महामार्गांच्या निर्मितीला गती मिळणार असून सुमारे ३४ प्रकल्पांना लाभ होणे अपेक्षित आहे. पायाभूत क्षेत्राच्या विकासालाही त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. बीओटी टोल माध्यमातून सर्व विद्यमान प्रकल्पांचा कालावधी वाढविण्याला परवानगी देण्याचे कामही प्राधिकरणाकडे सोपविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.