शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

महामार्ग विकासकांना भरपाई

By admin | Updated: November 19, 2015 03:39 IST

महामार्ग प्रकल्पांमध्ये अडचणी आल्यास आणि विकासकाकडून विलंब झालेला नसल्यास करार केलेल्या कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय)

नवी दिल्ली : महामार्ग प्रकल्पांमध्ये अडचणी आल्यास आणि विकासकाकडून विलंब झालेला नसल्यास करार केलेल्या कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. रखडलेले ३४ महामार्ग प्रकल्प मार्गी लावण्यास सरकारच्या या निर्णयाचा लाभ होईल, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. प्रत्येक प्रकरणाचे गुण-दोष विचारात घेऊन त्याआधारे नुकसानभरपाई देण्यासाठी प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपविणे हा धाडसी निर्णय आहे. प्रकल्पाच्या विलंबाला विकासक जबाबदार नसतील तर आवश्यकता भासल्यास टोल लावण्याचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे टोल प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून त्यांच्याकडे संचालनालयाची जबाबदारी सोपविली जाईल. या निर्णयामुळे महामार्गांच्या निर्मितीला गती मिळणार असून सुमारे ३४ प्रकल्पांना लाभ होणे अपेक्षित आहे. पायाभूत क्षेत्राच्या विकासालाही त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. बीओटी टोल माध्यमातून सर्व विद्यमान प्रकल्पांचा कालावधी वाढविण्याला परवानगी देण्याचे कामही प्राधिकरणाकडे सोपविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.