शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बालविवाह झालेल्या मुलींच्या वेदनांनी हायकोर्टाला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:38 IST

बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे.

हैदराबाद : बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे. बालविवाहाची प्रथा रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत तसेच बालविवाह झाल्याने मुलीवर व अपत्याच्या आरोग्यावर जो विपरित परिणाम झाला आहे ,अशांना मदत मिळावी या दुहेरी हेतूने न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.बालविवाह झालेल्या बी महालता व अन्य दहा जणींनी हे पत्र लिहिले असून, त्या साºया जणी १५ ते १९ वर्षे वयोगटाततील आहेत. तेलंगणामध्ये बालविवाहाच्या प्रथेमुळे कोणते दुष्परिणाम झाले आहेत, याची माहिती मुलींनी पत्रात दिली आहे. बालविवाह झालेल्या या मुली हक्कांपासून वंचित असून, लग्नानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे, हे लक्षात आल्यानंतर या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.बालविवाह झालेल्या मुलींपैकी काही जणी या गरोदरपणात वा बाळंतपणात मरण पावतात. ज्या मुली बाळंत होतात, त्यांच्या अपत्यांना काही आजार असतात. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देशातील बालविवाह झालेल्यांपैकी १८ टक्के मुलींनाही मिळत नाही. या मुलींचे आरोग्याचे प्रश्नही गंभीर असतात. अशा मुलींसाठी आश्रयाची ठिकाणे नाहीत. विपरित परिस्थितीतही त्यांनासासरी जाण्यासाठी माहेरहून दबाव टाकण्यात येतो.यापैकी अनेक मुली लैंगिक अत्याचार, हिंसाचाराच्या बळी ठरतात. त्यांच्या न्यायासाठी न्यायालयात जाण्याचे आर्थिक बळही पालकांकडे अनेकदा नसते. त्यामुळे या मुली निराश होतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.शिक्षणासाठी व्यवस्था हवीबालविवाहाच्या प्रथेचे संपूर्ण उच्चाटन व्हायला पाहिजे. बालविवाह झालेल्या मुलींच्या प्रवेशासाठी सर्व शिक्षण संस्थांनी ५ टक्के जागा राखीव ठेवल्या पाहिजेत. विशेष कौशल्य किंवा नोकरीसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणारी केंद्रे या मुलींसाठी सुरु करायला हवीत.>... शहरेही अपवाद नाहीतकायद्याने बंदी असली, तरी बालविवाहाची प्रथा आजही भारतात कायम आहे. केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्येच आजही मोठ्या संख्येने मुलींचे बालविवाह होतात असे नाही, तर महाराष्ट्रासारखे राज्यही त्याला अपवाद नाही. नोकरी कामधंद्यानिमित्त गावाकडून शहराकडे स्थलांतर करणाºयांचे प्रमाणही खूप मोठे आहे. लहान-मोठी नोकरी लागलेल्या तरुणाला आपल्या कोवळ््या वयातल्या मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. विवाह गावात लागत असतात, परंतु अशी दाम्पत्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.