शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

बालविवाह झालेल्या मुलींच्या वेदनांनी हायकोर्टाला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:38 IST

बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे.

हैदराबाद : बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे. बालविवाहाची प्रथा रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत तसेच बालविवाह झाल्याने मुलीवर व अपत्याच्या आरोग्यावर जो विपरित परिणाम झाला आहे ,अशांना मदत मिळावी या दुहेरी हेतूने न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.बालविवाह झालेल्या बी महालता व अन्य दहा जणींनी हे पत्र लिहिले असून, त्या साºया जणी १५ ते १९ वर्षे वयोगटाततील आहेत. तेलंगणामध्ये बालविवाहाच्या प्रथेमुळे कोणते दुष्परिणाम झाले आहेत, याची माहिती मुलींनी पत्रात दिली आहे. बालविवाह झालेल्या या मुली हक्कांपासून वंचित असून, लग्नानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे, हे लक्षात आल्यानंतर या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.बालविवाह झालेल्या मुलींपैकी काही जणी या गरोदरपणात वा बाळंतपणात मरण पावतात. ज्या मुली बाळंत होतात, त्यांच्या अपत्यांना काही आजार असतात. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देशातील बालविवाह झालेल्यांपैकी १८ टक्के मुलींनाही मिळत नाही. या मुलींचे आरोग्याचे प्रश्नही गंभीर असतात. अशा मुलींसाठी आश्रयाची ठिकाणे नाहीत. विपरित परिस्थितीतही त्यांनासासरी जाण्यासाठी माहेरहून दबाव टाकण्यात येतो.यापैकी अनेक मुली लैंगिक अत्याचार, हिंसाचाराच्या बळी ठरतात. त्यांच्या न्यायासाठी न्यायालयात जाण्याचे आर्थिक बळही पालकांकडे अनेकदा नसते. त्यामुळे या मुली निराश होतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.शिक्षणासाठी व्यवस्था हवीबालविवाहाच्या प्रथेचे संपूर्ण उच्चाटन व्हायला पाहिजे. बालविवाह झालेल्या मुलींच्या प्रवेशासाठी सर्व शिक्षण संस्थांनी ५ टक्के जागा राखीव ठेवल्या पाहिजेत. विशेष कौशल्य किंवा नोकरीसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणारी केंद्रे या मुलींसाठी सुरु करायला हवीत.>... शहरेही अपवाद नाहीतकायद्याने बंदी असली, तरी बालविवाहाची प्रथा आजही भारतात कायम आहे. केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्येच आजही मोठ्या संख्येने मुलींचे बालविवाह होतात असे नाही, तर महाराष्ट्रासारखे राज्यही त्याला अपवाद नाही. नोकरी कामधंद्यानिमित्त गावाकडून शहराकडे स्थलांतर करणाºयांचे प्रमाणही खूप मोठे आहे. लहान-मोठी नोकरी लागलेल्या तरुणाला आपल्या कोवळ््या वयातल्या मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. विवाह गावात लागत असतात, परंतु अशी दाम्पत्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.