शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

गुजरातमधील उच्च जातींतील गरिबांचे आरक्षण रद्द

By admin | Updated: August 5, 2016 04:21 IST

गुजरात सरकारने उच्च जातींमधील गरिबांसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये लागू केलेले १० टक्के आरक्षण गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरविले.

अहमदाबाद : आनंदीबेन पटेल सरकारच्या नाकीनऊ आणणारे हार्दिक पटेलचे पाटीदार आंदोलन शमविण्यास गुजरात सरकारने उच्च जातींमधील गरिबांसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये लागू केलेले १० टक्के आरक्षण गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरविले. त्यामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्नांत असलेल्या भाजपाची मोठी पंचाईत झाली.पाटीदार आंदोलनाच्या पाठोपाठ दलित अत्याचारांनी सर्वदूर पसरलेल्या असंतोषास आवर घालण्यासाठी आनंदीबेन यांच्याजागी नवा मुख्यमंत्री निवडण्याची भाजपाची धावपळ सुरु असतानाच उच्च न्यायालयाने हा दणका दिल्याने पक्षापुढे नवी डोकेदुखी उभी राहण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाचा हा निकाल येताच हार्दिक पटेलने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा दिलेला इशारा हा नव्या मुख्यमंत्र्यापुढील नवे आव्हान ठरेल, असे दिसते.वजनदार व्यापारी समाज असलेल्या पटेल-पाटीदारांची गुजरातमध्ये लोकसंख्या १७ टक्के आहे व हा समाज परंपरागत भाजपाचा मतदार राहिलेला आहे. यासोबत सुमारे १० टक्के असलेल्या दलित समाजावर पुढील वर्षात होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची भाजपाची भिस्त आहे. विरोधात गेलेल्या पाटीदार-पटेल समाजाला शांत करण्यासाठी उच्च जातींमधील गरिबांसाठी आरक्षणाचा हा वटहुकूम काढला होता. दलित समाजातही असंतोष खदखदत असताना पाटीदारांना खुश करण्यासाठी योजलेल्या आरक्षणाच्या उपायाला खीळ बसल्याने भाजपाला नवी राजकीय समीकरणे शोधावी लागणार आहेत. अलीकडेच झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का आधीच्या ५०.२६ टक्क्यांवरून ४३.९७ टक्क्यांवर आल्याने भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागात असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींसाठी मिळून आधीपासूनच ४९.५ टक्के आरक्षण आहे. त्याउप्पर पुढारलेल्या जातींमधील सहा लाखांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी १० टक्के आरक्षण लागू करणारा वटहुकूम राज्य सरकारने काढला होता. त्यास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्यायाधीश न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. व्ही. एम. पंचोली यांच्या खंडपीठाने सर्व याचिका मंजूर करून १० टक्के आरक्षण रद्द केले. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नाही व एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही, या मुद्द्यांवर हा निकाल दिला गेला. हे आरक्षण नाही तर वर्गीकरण आहे, हा सरकारचा बचाव न्यायालयाने फेटाळला. (वृत्तसंस्था)>सरकार या निकालपत्राचा अभ्यास करून लवकरच त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेल.-नितिन पटेल, मंत्री व प्रवक्ते, गुजरात सरकारहे आरक्षण म्हणजे मूर्ख बनविण्यासाठी दिलेले लॉलिपॉप होते. ओबीसी कोट्यातून आरक्षणासाठी आमचे आंदोलन पुन्हा सुरु होईल. -हार्दिक पटेल, अध्यक्ष, पाटीदार अमानत आंदोलन समिती