शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, दिल्ली मेट्रोच्या मेजेंटा लाइनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:00 IST

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. दिल्ली मेट्रोच्या १२ किमी लांंब मेजेंटा लाइनचे उद्घाटन झाल्यानंतर, एका सभेला ते संबोधित करत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कधी-कधी विकासाची कामे जनहिताच्या तराजूत तोलण्याऐवजी राजकीय तराजूत तोलली जातात. राजकीय लाभ असतानाच, काम करायला हवे काय? असा प्रश्न करून ते म्हणाले की, राजकीय लाभ नसताना, देशाला अधांतरी सोडून द्यायचे काय? त्यामुळेच देशाने असे सरकार निवडले आहे, जे नीति, धोरणावर चालते. आमची कामे लोकांच्या जीवनात बदल करणारे आहेत. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, हा देश समृद्ध आणि संपन्न आहे. मात्र, देशाच्या जनतेला या समृद्धीपासून दूर ठेवण्यात आले आहे.मोदी म्हणाले की, अनेक समस्यांच्या मुळाशी शासन व्यवस्था आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, वाजपेयींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन सुशासनासोबत देशाला नव्या उंचीवर नेण्याचा आम्ही संकल्प केला आहे. मेट्रो रेल्वेसेवेचा उल्लेख करून ते म्हणाले की, यातून कोणी उद्योगपती नव्हे, तर सामान्य लोक प्रवास करतील. मेट्रोने प्रवास करणे प्रतिष्ठेचा मुद्दा व्हायला हवा. तेव्हाच आम्ही देशाच्या अनेक समस्या सोडवू शकतो. पेट्रोलियम पदार्थ आयात करण्यावर होणारा खर्चही यामुळे कमी होईल.>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बॉटनिकल गार्डन ते ओखला बर्ड सेंच्युरी स्टेशनच्या दरम्यान मेट्रोने प्रवासही केला. या वेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी व दिल्ली मेट्रो रेल्वेचे प्रमुख मंगू सिंह यांची उपस्थिती होती. ४ मिनिटांच्या प्रवासानंतर ते ओखला बर्ड सेंच्युरी येथे उतरले.>नोएडात येणाºया योगींचे कौतुकनोएडात येणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते, असा अंधविश्वास असल्याने अनेक मुख्यमंत्री नोएडात फिरकत नाहीत. मात्र, योगी आदित्यनाथ आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावर बोलताना मोदी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे कपडे पाहून असा प्रचार केला जातो की, ते आधुनिक विचारांचे नाहीत, पण हा प्रचार त्यांनी खोटा ठरविला आहे.>हा तर दिल्लीच्या जनतेचाअपमान : सिसोदियादिल्ली मेट्रोच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण न देणे म्हणजे दिल्लीच्या लोकांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मेट्रोचे दर कमी करण्याची मागणी केजरीवाल मोदींकडे करतील, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच केजरीवाल यांना बोलाविले नाही.

टॅग्स :Ram Naikराम नाईकyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी