शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, दिल्ली मेट्रोच्या मेजेंटा लाइनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:00 IST

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. दिल्ली मेट्रोच्या १२ किमी लांंब मेजेंटा लाइनचे उद्घाटन झाल्यानंतर, एका सभेला ते संबोधित करत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कधी-कधी विकासाची कामे जनहिताच्या तराजूत तोलण्याऐवजी राजकीय तराजूत तोलली जातात. राजकीय लाभ असतानाच, काम करायला हवे काय? असा प्रश्न करून ते म्हणाले की, राजकीय लाभ नसताना, देशाला अधांतरी सोडून द्यायचे काय? त्यामुळेच देशाने असे सरकार निवडले आहे, जे नीति, धोरणावर चालते. आमची कामे लोकांच्या जीवनात बदल करणारे आहेत. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, हा देश समृद्ध आणि संपन्न आहे. मात्र, देशाच्या जनतेला या समृद्धीपासून दूर ठेवण्यात आले आहे.मोदी म्हणाले की, अनेक समस्यांच्या मुळाशी शासन व्यवस्था आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, वाजपेयींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन सुशासनासोबत देशाला नव्या उंचीवर नेण्याचा आम्ही संकल्प केला आहे. मेट्रो रेल्वेसेवेचा उल्लेख करून ते म्हणाले की, यातून कोणी उद्योगपती नव्हे, तर सामान्य लोक प्रवास करतील. मेट्रोने प्रवास करणे प्रतिष्ठेचा मुद्दा व्हायला हवा. तेव्हाच आम्ही देशाच्या अनेक समस्या सोडवू शकतो. पेट्रोलियम पदार्थ आयात करण्यावर होणारा खर्चही यामुळे कमी होईल.>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बॉटनिकल गार्डन ते ओखला बर्ड सेंच्युरी स्टेशनच्या दरम्यान मेट्रोने प्रवासही केला. या वेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी व दिल्ली मेट्रो रेल्वेचे प्रमुख मंगू सिंह यांची उपस्थिती होती. ४ मिनिटांच्या प्रवासानंतर ते ओखला बर्ड सेंच्युरी येथे उतरले.>नोएडात येणाºया योगींचे कौतुकनोएडात येणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते, असा अंधविश्वास असल्याने अनेक मुख्यमंत्री नोएडात फिरकत नाहीत. मात्र, योगी आदित्यनाथ आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावर बोलताना मोदी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे कपडे पाहून असा प्रचार केला जातो की, ते आधुनिक विचारांचे नाहीत, पण हा प्रचार त्यांनी खोटा ठरविला आहे.>हा तर दिल्लीच्या जनतेचाअपमान : सिसोदियादिल्ली मेट्रोच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण न देणे म्हणजे दिल्लीच्या लोकांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मेट्रोचे दर कमी करण्याची मागणी केजरीवाल मोदींकडे करतील, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच केजरीवाल यांना बोलाविले नाही.

टॅग्स :Ram Naikराम नाईकyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी