शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हॅलो १- साळ बंधार्‍यावरील धांगडधिंगाणा रोखण्यास पोलीस

By admin | Updated: May 5, 2015 01:22 IST

फोटो : साळ बंधार्‍याची पाडरी करताना उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, आमदार नरेश सावळ, मामलेदार देसाई. (छाया : विशांत वझे)

फोटो : साळ बंधार्‍याची पाडरी करताना उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, आमदार नरेश सावळ, मामलेदार देसाई. (छाया : विशांत वझे)
डिचोली : साळ येथील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या बंधार्‍यार धांगडधिंगाणा वाढत चालला असून मौजमजा कर्‍यासाठी येणार्‍या हौशी लोकांकडून दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे व बाटल्या काचा, कचरा फेकण्याचे प्रकार वाढीस लागले असून उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, मामलेदार गुरूदास देसाई आमदार नरेश सावळ यांनी परवा या ठिकाणाला भेट देऊन कडक पोलीस पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जलसंसाधन खात्याचे साळ --- नदीवर बंधारा वजा छोटा पूल उभारून डिचोली व पेडणे तालुक्याला जोडलेले आहे. बंधार्‍याच्या एका बाजूला आंघोळीसाठी निसर्गरम्य वातावरण असून मुबलक पाणी असल्याचे पर्यटनाची गोव्याच्या कानाकोपर्‍यातून रिघ लागते.
या ठिकाणी मांडयान या भागात देवाचे पवित्र स्थान असल्याने या भागात पर्यटकांना धांगडधिंगाणा बाधा आणत असून या बाबत स्थानिक सरपंच घन:श्याम राऊत यांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. परवा उपजिल्हाधिकारी, मामलेदार, आमदार नरेश सावळ, जलसंसाधन खात्याचे अभियंता, पी.व्ही. श्रीकुमार, सरपंच घन:श्याम राऊत, पंचायत मंडळाने या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली.
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक गोंधळ घालतात. काही लोक दारू पितात, जेवण, प्लास्टिक नदीतच टाकून प्रदूषण करतात. ही बाब आमदार सावळ व सरपंच राऊत यांनी उपजिल्हाधिकार्‍यांच्या नजरेस आणून दिली.
पहारा ठेवणार : उपजिल्हाधिकारी
या ठिकाणी देवाचे पवित्र स्थान असल्याने दारू व इतर गोष्टीमुळे जो त्रास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करून पहारा ठेवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी सांगितले. मोठ्या संख्येने लोक येत असल्याने नियंत्रण ठेवायला हवे व पर्यटकांनी आनंद जरूर लुटावा पण मस्ती करू नये, कचरा करू नये असे आवाहन आमदार नरेश सावळ यांनी केले आहे.
मामलेदार गुरूदास देसाई यांनी जनतेला चांगल्या प्रकारे या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असून मे महिन्यात गर्दी वाढत असल्याने आवश्यक बंदोबस्त करण्यात आला असल्याचे सांगितले.
उत्कृष्ट पर्यटन स्थळ
हा परिसर निसर्गाचे वरदान ठरलेला असून योग्य नियोजन करून केरकचरा, दारूबंदी लागू करून स्वच्छता राखण्याची गरज असून येथे फिरते शौचालय, कपडे बदलण्यासाठी रूम्स, तसेच स्थानिकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी सोय केल्यास गावाला फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत मात्र अंधाधुंदी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे सरपंच घन:श्याम राऊत यांनी सांगितले.