शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:15 IST

केरळमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दक्षिण व ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम असून, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. या दोन राज्यांत भूस्खलनासारख्या दुर्घटनांत आतापर्यंत अनुक्रमे ५ व ९ लोकांचा मृत्यू झाला असून, कर्नाटकात ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, देशाच्या इतर भागांत ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरी पडल्या आहेत.

आसाममध्ये अनेक भागांत पूरस्थिती असून, गेल्या २४ तासांत भूस्खलनात ५ जण दगावले आहेत. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी मदत छावण्यांत हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने नागरिकांना वाचविले आहे.

अरुणाचल : भूस्खलनात वाहन वाहून गेले, ७ ठार

अरुणाचल प्रदेशात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१३वर भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका भूस्खलनाच्या घटनेत दोघे दगावले. भूस्खलनानंतर हे वाहन दरीत कोसळले. यात वाहनातील सातही जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांच्या घरात पाणी

केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, सखल भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यात हलवण्यात आले आहे. राज्याच्या उत्तर भागांत रस्ते पाण्याखाली असून, जवळपास सर्वच भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: कासरगोड जिल्ह्यात मधुवाहिनी नदीला आलेल्या पुरात रस्ते वाहून गेले आहेत. अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत.

ऊन-पावसाचा खेळ

या राज्यात गेल्या चोवीस तासांत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर जैसलमेरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. किशनगंजमध्ये सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

इंडोनेशियात खाण खचल्याने १७ ठार

सायरेबॉन : इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात खोदकाम सुरू असताना एक खाण धसल्याने १७ ठार तर अनेक जण बेपत्ता झाले. सायरेबॉन जिल्ह्यातील गुनुंग कुडा खदानीत भूस्खलन झाल्याने शुक्रवारी ही दुर्घटना घडली. दोन डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत ढिगाऱ्याखालून १६ जणांचे मृतदेह व काही जखमींना बाहेर काढण्यात आले. एका जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली. ६ ते ८ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबलेले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशmizoram-pcमिजोरम