शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:15 IST

केरळमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दक्षिण व ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम असून, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. या दोन राज्यांत भूस्खलनासारख्या दुर्घटनांत आतापर्यंत अनुक्रमे ५ व ९ लोकांचा मृत्यू झाला असून, कर्नाटकात ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, देशाच्या इतर भागांत ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरी पडल्या आहेत.

आसाममध्ये अनेक भागांत पूरस्थिती असून, गेल्या २४ तासांत भूस्खलनात ५ जण दगावले आहेत. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी मदत छावण्यांत हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने नागरिकांना वाचविले आहे.

अरुणाचल : भूस्खलनात वाहन वाहून गेले, ७ ठार

अरुणाचल प्रदेशात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१३वर भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका भूस्खलनाच्या घटनेत दोघे दगावले. भूस्खलनानंतर हे वाहन दरीत कोसळले. यात वाहनातील सातही जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांच्या घरात पाणी

केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, सखल भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यात हलवण्यात आले आहे. राज्याच्या उत्तर भागांत रस्ते पाण्याखाली असून, जवळपास सर्वच भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: कासरगोड जिल्ह्यात मधुवाहिनी नदीला आलेल्या पुरात रस्ते वाहून गेले आहेत. अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत.

ऊन-पावसाचा खेळ

या राज्यात गेल्या चोवीस तासांत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर जैसलमेरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. किशनगंजमध्ये सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

इंडोनेशियात खाण खचल्याने १७ ठार

सायरेबॉन : इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात खोदकाम सुरू असताना एक खाण धसल्याने १७ ठार तर अनेक जण बेपत्ता झाले. सायरेबॉन जिल्ह्यातील गुनुंग कुडा खदानीत भूस्खलन झाल्याने शुक्रवारी ही दुर्घटना घडली. दोन डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत ढिगाऱ्याखालून १६ जणांचे मृतदेह व काही जखमींना बाहेर काढण्यात आले. एका जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली. ६ ते ८ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबलेले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशmizoram-pcमिजोरम