शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

राजस्थानमध्ये पावसाचा कहर; माउंट आबूत अडकले 2 हजार पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 18:32 IST

राजस्थानमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथिल जनजीवन विस्कळीत झालं आहे

ठळक मुद्देराजस्थानमध्ये पावसाचा कहर; माउंट आबूत अडकले 2 हजार पर्यटक मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत माऊंट आबूमध्ये 733.6 एमएम पावसाची नोंद झाली आहेजिल्ह्यातील सगळ्या धरणांनी धोक्याची पातळी गाठली आहे. 

माउंट आबू , दि. 26- राजस्थानमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथिल जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजस्थानच्या माउंट आबूमध्येही मुसळधार पावसामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आहे. तेथे पावसाने गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्डही तोडला आहे.  माउंट आबूमध्ये गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन हजार पर्यटक अडकल्याची माहिती मिळते आहे. पावसामुळे तेथे भुस्खलन झालं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तेथिल वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतूक थोड्या प्रमाणात पूर्वपदावर यायला अजूनही काही तास लागणार असल्याची माहिती मिळते आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत माऊंट आबूमध्ये 733.6 एमएम पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे तेथिल परिस्थिती गंभीर झाली असून जिल्ह्यातील सगळ्या धरणांनी धोक्याची पातळी गाठली आहे. 

राजस्थानमध्ये जनजीवन विस्कळीतराजस्थानच्या जालोर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती कायम असून गेल्या २४ तासांत २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव (आपत्कालीन विभाग) हेमंत गेरा यांनी सांगितले की, पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याचे जवान आणि राष्ट्रीय आपत्कालीन विभाग कार्यरत आहेत.जालोरचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण सोनी यांनी सांगितलं की, जालोरमध्ये झाडावर बसलेल्या सात लोकांना हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित बाहेर काढलं आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने अन्य १९ जणांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. पालीचे जिल्हाधिकारी सुधीर नायक यांनी सांगितले की, येथे पूरस्थितीत सुधारणा होत आहे. मदतकार्य वेगाने सुरु आहे आणि पुरात फसलेल्या नागरिकांना एनडीआरएफ, सैन्याचे जवान आणि जिल्हा प्रशासन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी २४ तासात दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम पूर्व राजस्थानात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यातील माउंट आबू येथे सर्वाधिक ७३३ मिमी पाऊस झाला आहे. जालोरमध्ये ४३, बाडमेर ४१, फलोदी २७ मिमी पाऊस झाला आहे.ओडिशात सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले आहेत. केंझार, भद्रक आणि जयपूर जिल्ह्यातील सखल भागातील नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत. बैतराणी, ब्रह्माणी, सुवर्णरेखा, जलाका या नद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ६० शिबिरं स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.या पुरामुळे हजारो नागरिकांना फटका बसला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मंगळवारी सकाळी संसद भवनात मोदी यांच्याशी चर्चा करून पूरस्थितीची माहिती त्यांना दिली. गत २४ तासांत बनासकांठा, पाटन आणि साबरकांठा जिल्ह्यात २०० मिमी पाऊस झाला आहे.