शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

ओडिशाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 03:58 IST

‘फनी’चा कहर : पश्चिम बंगाल व बांगलादेशकडे सरकले वादळ

भुवनेश्वर : मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह फोनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने आठ जणांचे बळी घेतले.पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, मनुष्यहानीचे वृत्त नाही. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.

ओडिशाचे विशेष आयुक्त बी. पी. सेठी म्हणाले की, चक्रीवादळामुळे गंजम, पुरी, खोरधा आणि गजपती या जिल्ह्यांतील १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांतील १२ लाख लोकांना ४,००० शिबिरांत हलविण्यात आले. यात ८८० तटरक्षक दलांच्या केंद्रांचा समावेश आहे. एक लाख भोजनाची पाकिटे वाटली असून, लोक शिबिरांत असेपर्यंत त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रसंगी दोन हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात येईल.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार १००० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी सकाळी ८ पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे ३00 हून अधिक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.

१२ लाख लोक सुरक्षित ठिकाणीप्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी ८ वाजता पुरीच्या समुद्र किनाºयावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने १२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे २०० किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.

तटरक्षक, नौदल सज्जभारतीय तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, गोपालपूर, हल्दिया व कोलकातामध्ये ३४ आपत्कालीन केंद्रे सुरू केली आहेत. चार जहाजेही सज्ज आहेत. नौदलाने मदत साहित्य आणि मेडिकल टीमसह तीन जहाजेही तैनात केली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हवाई सर्वेक्षणासाठी आमची विमाने तयार आहेत. फोनी हे सर्वात धोकादायक चक्रीवादळ समजले जाते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या ११ जिल्ह्यांत सर्व दुकाने, व्यवसायिक प्रतिष्ठाने, सरकारी आणि खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. शनिवारीही ती बंद राहतील.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा