शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

ओडिशाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 03:58 IST

‘फनी’चा कहर : पश्चिम बंगाल व बांगलादेशकडे सरकले वादळ

भुवनेश्वर : मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह फोनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने आठ जणांचे बळी घेतले.पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, मनुष्यहानीचे वृत्त नाही. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.

ओडिशाचे विशेष आयुक्त बी. पी. सेठी म्हणाले की, चक्रीवादळामुळे गंजम, पुरी, खोरधा आणि गजपती या जिल्ह्यांतील १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांतील १२ लाख लोकांना ४,००० शिबिरांत हलविण्यात आले. यात ८८० तटरक्षक दलांच्या केंद्रांचा समावेश आहे. एक लाख भोजनाची पाकिटे वाटली असून, लोक शिबिरांत असेपर्यंत त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रसंगी दोन हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात येईल.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार १००० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी सकाळी ८ पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे ३00 हून अधिक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.

१२ लाख लोक सुरक्षित ठिकाणीप्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी ८ वाजता पुरीच्या समुद्र किनाºयावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने १२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे २०० किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.

तटरक्षक, नौदल सज्जभारतीय तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, गोपालपूर, हल्दिया व कोलकातामध्ये ३४ आपत्कालीन केंद्रे सुरू केली आहेत. चार जहाजेही सज्ज आहेत. नौदलाने मदत साहित्य आणि मेडिकल टीमसह तीन जहाजेही तैनात केली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हवाई सर्वेक्षणासाठी आमची विमाने तयार आहेत. फोनी हे सर्वात धोकादायक चक्रीवादळ समजले जाते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या ११ जिल्ह्यांत सर्व दुकाने, व्यवसायिक प्रतिष्ठाने, सरकारी आणि खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. शनिवारीही ती बंद राहतील.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा