शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

उत्तर भारतात उष्णतेची लाट, उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 08:39 IST

भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे.

नवी दिल्लीः भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे. वेगवेगळ्या राज्यांत उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मैदानी राज्यांनाच नव्हे, तर पर्वतीय राज्यांनाही बसत आहेत. हिमाचलमधल्या ऊनामध्ये 42 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच पर्वतीय भागात उष्णतेचा कहर जाणवतो आहेत. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं आहे. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे.तर रविवारी तिथे 48.9 डिग्री सेल्सियस तापमान होतं. तसेच श्रीगंगानगर आणि बीकानेरमध्येही तापमान 48 अंशांच्या वर गेलं होतं. बाडमेर, जैसलमेर आणि कोटामध्ये तापमान 47 अंश सेल्सियसहून अधिक राहिलं. हवामान खात्यानं उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं सांगत 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदामध्ये काल दुपारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दुपारनंतर कोसळलेल्या पाऊस सरींनी काहीशी विश्रांती दिली असली तरी वादळानं अंगावर झाड आणि खांबे कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये वातावरणात बदल झाला आहे. चमोली, रुद्रपयाग, पिथोरीगड आणि उत्तरकाशीशिवाय डेहराडून आणि हरिद्वारमध्ये हलक्या पावसानं गारवा निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात