शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उत्तर भारतात उष्णतेची लाट, उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 08:39 IST

भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे.

नवी दिल्लीः भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे. वेगवेगळ्या राज्यांत उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मैदानी राज्यांनाच नव्हे, तर पर्वतीय राज्यांनाही बसत आहेत. हिमाचलमधल्या ऊनामध्ये 42 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच पर्वतीय भागात उष्णतेचा कहर जाणवतो आहेत. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं आहे. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे.तर रविवारी तिथे 48.9 डिग्री सेल्सियस तापमान होतं. तसेच श्रीगंगानगर आणि बीकानेरमध्येही तापमान 48 अंशांच्या वर गेलं होतं. बाडमेर, जैसलमेर आणि कोटामध्ये तापमान 47 अंश सेल्सियसहून अधिक राहिलं. हवामान खात्यानं उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं सांगत 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदामध्ये काल दुपारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दुपारनंतर कोसळलेल्या पाऊस सरींनी काहीशी विश्रांती दिली असली तरी वादळानं अंगावर झाड आणि खांबे कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये वातावरणात बदल झाला आहे. चमोली, रुद्रपयाग, पिथोरीगड आणि उत्तरकाशीशिवाय डेहराडून आणि हरिद्वारमध्ये हलक्या पावसानं गारवा निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात