शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 22:36 IST

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू  तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित  कोरोनाचा संसर्ग झाले 151 रुग्णे ठणठणीत बरे

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 328 नवे कोरोनाग्रस्त आढून आले आहेत. तर दर दोन तासाला एकाचा मृत्यू होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

1 दिवसात मरणारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक -

अग्रवाल म्हणाले, गेल्या 24 तासांत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 50 वैद्यकीय कर्मचारी आहेत. यात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

तलबीगी जमातशी संबंधित 400 जण कोरोना संक्रमित -

कोरोनासंदर्भातील लढाई सुरूच आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला हवे.  राज्य सरकारांनीही लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करायला हवी. मुंबईतील धारावीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झ्याल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच देशभरात तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित आहेत. तर 1804 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या सूचना दिल्या. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाईन ट्रेनिंगपासून ते रिटायर्ड डॉक्टरांची मदत मागण्यासंदर्भात अनेक मुद्द होते. तसेच कोरोनासंदर्भात रुग्णालयांसंदर्भातही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे लव अग्रवाल म्हणाले.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - 

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्याम पंतप्रधान मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, याचीही काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी