शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 22:36 IST

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू  तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित  कोरोनाचा संसर्ग झाले 151 रुग्णे ठणठणीत बरे

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 328 नवे कोरोनाग्रस्त आढून आले आहेत. तर दर दोन तासाला एकाचा मृत्यू होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

1 दिवसात मरणारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक -

अग्रवाल म्हणाले, गेल्या 24 तासांत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 50 वैद्यकीय कर्मचारी आहेत. यात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

तलबीगी जमातशी संबंधित 400 जण कोरोना संक्रमित -

कोरोनासंदर्भातील लढाई सुरूच आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला हवे.  राज्य सरकारांनीही लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करायला हवी. मुंबईतील धारावीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झ्याल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच देशभरात तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित आहेत. तर 1804 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या सूचना दिल्या. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाईन ट्रेनिंगपासून ते रिटायर्ड डॉक्टरांची मदत मागण्यासंदर्भात अनेक मुद्द होते. तसेच कोरोनासंदर्भात रुग्णालयांसंदर्भातही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे लव अग्रवाल म्हणाले.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - 

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्याम पंतप्रधान मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, याचीही काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी