शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVaccine News: होळीपूर्वीच येईल कोरोना लस, आरोग्यमंत्र्यांना पूर्ण विश्वास; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 17:00 IST

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कोतुक करताना हर्षवर्धन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोरोनावरील लस पुढील तीन ते चार महिन्यांत तयार होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना वॉरियर्सना स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. यानंतर वृद्ध तसेच आजारी लोकांना लस टोचली जाईल.

नवी दिल्ली - मला विश्वास आहे, कोरोनावरील लस पुढील तीन ते चार महिन्यांत तयार होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी फिक्की एफएलओच्या एक वेबिनारला संबोधित करत होते. यावेळी, 135 कोटी भारतीयांना ही लस पुरविण्याचा प्राधान्य क्रम वैज्ञानिक मूल्यांकनावर निर्धारित केला जाईल, असेही ते म्हणाले.

हर्षवर्धन म्हणाले, 'मला विश्वास आहे, की पुढील तीन चार महिन्यांतच कोरोना लस तयार होईल. मात्र, लसीचे प्राधान्य वैज्ञानिक डेटाच्या आधारावरच निर्धारित करण्यात येईल. आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना वॉरियर्सना स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. यानंतर वृद्ध तसेच आजारी लोकांना लस टोचली जाईल. लसिकरणासंदर्भात मोठी योजना तयार केली जात आहे. याच्या ब्लूप्रिंटवर चर्चा करण्यासाठी एक ई व्हॅक्सीन इंटॅलिजेन्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आशा आहे, की 2021 हे आपल्या सर्वांसाठी एक चांगले वर्ष ठरेल.

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; आता मास्क न वापरणाऱ्यांना द्यावा लागणार 2 हजार रुपये दंड

सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले  कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कोतुक करताना हर्षवर्धन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू, हा पंतप्रधान मोदींचा एक फारच चांगला प्रयोग होता. यात जनतेची राष्ट्रव्यापी भागीदारी होती. लॉकडाउन आणि अनलॉक लागू करणे, हे केंद्र सरकारच्या काही धाडसी निर्णयांपैकीच महत्वाचे निर्णय होते. आपण फार चांगले काम केले आहे.

या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते  हर्षवर्धन म्हणाले, या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळं, बंदरं आणि जमिनी सीमांवर लक्ष ठेवण्यात आले. गेल्या 11 महिन्यातील कामांचा पाढा वाचताना, हर्षवर्धन म्हणाले, अत्यंत कमी वेळात कोरोना महामारीच्या प्रकोपाला नियंत्रित करणाऱ्या काही मोजक्या देशांत भारतही आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आणि एन  95 मास्कची कमी भासली. मात्र, काही महिन्यातच आपण या गोष्टी जगातील काही देशांना निर्यात करण्यात सक्षम झालो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारmedicineऔषधं