शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

हेल्थ अॅलर्ट - भारतात 7 कोटी लोकांना डायबेटीस

By admin | Updated: April 27, 2016 13:20 IST

देशातील 7 कोटी लोक डायबेटीसच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती सरकारने दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 27 - देशातील 7 कोटी लोक डायबेटीसच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 2014 मध्ये 6.68 कोटी तर 2015 मध्ये 6.91 कोटी लोकांना डायबेटीज होता. 20 ते 70 वयोगटातील लोकांची तपासणी केली असता ही माहिती समोर आली होती. आता मात्र हा आकडा 7 कोटींच्या जवळ गेला असल्याचं आंतरराष्ट्रीय डायबेटीस फेडरेशनने सांगितलं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी राज्यसभेत लेखी उत्तररातून दिली आहे. 
 
लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या लेखात डायबेटीस रुग्णांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागत असल्याच म्हटलं आहे. या यादीत पहिल्या तीन देशांमध्ये भारतासह चीन आणि अमेरिकेचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात चीनने भारताला मागे टाकले आहे. चीनमध्ये सर्वात जास्त 10 कोटी डायबेटीस रुग्ण आहे. त्यानंतर भारत दुस-या क्रमांकावर असून अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 29 कोटी डायबेटीस रुग्ण आहेत.
गेल्या काही वर्षात महिलांमधील डायबेटीसचे प्रमाणदेखील वाढत आहे. 1980 ते 2014 दरम्यान महिलांमधील डायबेटीसचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढलं आहे. कर्करोग, डायबेटीस आणि हृदयासंबंधी आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय कार्यक्रम आखत असल्याची माहिती जे पी नड्डा यांनी दिली आहे. वेगाने वाढणारे डायबेटीसचे रुग्ण ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. 2015 मध्ये डायबेटीसमुळे 1 लाख 27 हजार 911 लोकांचा मृत्यू झाला आहे. डायबेटीसवर नियंत्रण नाही आणलं तर 2030 पर्यंत रुग्णांचा आकडा 10 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.