शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मला 'अल-कायदा' इंडियाचा प्रमुख

By admin | Updated: December 19, 2015 12:18 IST

'अल-कायदा' या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या भारतातील शाखेचा सनाऊल हक हा उत्तर प्रदेशमधील एका स्वातंत्र सैनिकाच्या कुटुंबाशी संलग्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - 'अल-कायदा' या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या भारतातील शाखेचा सनाऊल हक हा उत्तर प्रदेशमधील एका स्वातंत्र सैनिकाच्या कुटुंबाशी संलग्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल-कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेची जबाबदारी सांभाळणारा आणि सुरक्षा दलाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेला ४० वर्षीय मौलाना असीम उमर हा उत्तर प्रदेशमधील संभलचा रहिवासी असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सनाऊलचे वडील इरफान याच्या वडिलांचे नातेवाईक स्वातंत्र्य सैनिक होते.
सध्या फरार असलेला सनाऊल १४ वर्षांपूर्वीच घरातून पळून गेला आणइ दहशतवादी संघटनांसाठी काम करू लागला. तो अल कायदाचा इंडिया चीफ म्हणून काम करतो, अल जवाहिरी यांनी गेल्या वर्षी त्याची निवड केली होती.
दरम्यान या माहितीमुळे सनऊलच्या कुटुंबियांना धक्का बसला असला तरीही त्यांना फारसे आश्चर्य वाटलेले नाही. ' सनाऊलने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याची माहिती स्थानिक गुप्तचर संस्थेच्या अधिका-यांनी आम्हाला ६ वर्षांपूर्वी दिली होती, आमच्यासाठी तो तेव्हाच मेला होता' अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्याच्या ७० वर्षीय आईने दिली. 
२००९ साली स्थानिक गुप्तहेर एंजट्सनी संभल येथील दीपा सराई गावात जाऊन सनौल हकच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
' तुमचा मुलगा १४ वर्षांपूर्वीच मरण पावला असं तुम्हाला वाटत होतं, पण तो जिवंत असून तो तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान तसेच अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांसाठी काम करत आहे' अशी माहिती त्यांनी हकच्या कुटुंबियांना दिली. यामुळे अतिशय दु:खी व व्यथित झालेल्या सनौल हकचे वडील इरफान-उल-हक यांनी वडिलांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सनौलशी आपला काहीही संबध नसल्याचे जाहीर करत त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले
' सनौलला पहिल्यापासूनच वाचनात, पुस्तकांत रस होता. पण एके दिवशी अचानक त्याने मदरसात जाऊन कुराण व अरबी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. जर मी शिकून हाफिज बनलो तर आपल्या सर्वांना  स्वर्ग मिळेल, असे त्याने आम्हाला सांगितले. मी या गोष्टीसाठी राजी नव्हतो, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याने आमचे काहीच ऐकले नाही, असे हकचे वडील इरफान-उल-हक यांनी सांगितले.  '१९५ साली त्याने पुढील शिक्षणसाठी मक्का येथे जाण्याबद्दल सांगत माझ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि परिस्थिती आणखीनच बिघडली. मला त्याच्या मागणीमुळे धक्का बसला. कुटुंबाची मदत करण्यासाठी एखादी नोकरी शोध किंवा इथेच शिक्षण घे असे मी त्याला सांगितले, पण त्याला हा देश सोडूनच जायचं होत. या मुद्यावरून खूप वाद झाले, त्याच्या काकांनी त्याला खूप मारलही. आम्हाला त्याची खूप काळजी वाटत होती, असे त्याचे वडील म्हणाले.
आणि एके दिवशी अचानक सनौल गायब झाला आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तो हरवल्याची तक्रार नोंदवली. १४ वर्ष उलटून गेल्यावरही त्याचा काहीच शोध न लागल्याने तो मरण पावला, असे त्याच्या कुटुंबियांना वाटले मात्र गुप्तचरांनी अचानक त्यांच्या घरी येऊन तो दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची माहिती दिल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला.