शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:14 IST

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.

नवी दिल्ली -  दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.‘गेट््सनोट्स’ या ब्लॉगवर गेट््स यांनी ज्यांच्या कामाची महती जगभर पोहोचविली ते डॉ. वर्गीज प्रथमदर्शनी तुम्हाला डॉक्टर आहेत, असे वाटणारही नाही. कारण त्यांच्याकडे स्टेथोस्कोप नसतो. उलट त्यांच्या हातातील आयुधे पाहिली तर ते सूतार असावेत असे वाटते. रुग्णाचे अवयव किती प्रतिसाद देतात हे तपासण्यासाठी त्यांच्या हातात हातोडा असतो, रुग्णाच्या हाता-पायांची लांबी मोजण्यासाठी त्यांच्या गळ््यात टेप असते व कोनाचे नेमके मोजमाप करण्यासाठी त्यांच्यापाशी ‘गॉनिनोमीटर’ हे उपकरणही असते.गेट््स यांनी केलेल्या प्रशंसेविषयी प्रतिक्रिया विचारता डॉ. वर्गीज म्हणाले, कोतुक वा टिकेने व्यक्तिश: मी करीत असलेल्या कामात काहीच फरक पडत नाही. परंतु पोलिओग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी पुढे येण्यास आणखी डॉक्टरांना व तरुणांना याने प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. डॉ. वर्गीज म्हणाले की, अवयवांत आलेले व्यंग दूर करण्यासाठी थोडीफार शस्त्रक्रिया केली व भरपूर मानसिक आधार दिला की, पोलिओग्रस्त व्यक्तीही इतर कोणाहीप्रमाणे स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते व देशाच्या विकासाला हातभार लावू शकते. त्यामुळे मी एकटा करत असलेले काम पुरेसे नाही. सरकार आणि समाजाने पोलिओग्रस्तांविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. पोलिओग्रस्तांचे पुनर्वसन हा एकच ध्यास घेऊन डॉ. वर्गीज गेली नेक वर्षे काम करत आहेत. सेंट स्टीफन्स इस्पितळातील पोलिओ वॉर्डमध्ये एकही रुग्ण न येता हा वॉर्ड पूर्णपणे रिकामा पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पोलिओमुळे हात-पाय लुळे झालेल्या असंख्य स्त्री-पुरुषांच्या दृष्टीने ते जणू देवदूत आहेत. डॉ. वर्गीज यांच्यामुळे हे लोक आज कोणाच्याही मदतीशिवाय आपापले आयुष्य जगत आहेत. हे नाते कवळ डॉक्टर व रुग्णापुरते राहिले नसून ते रुग्णांच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत.पोलिओ गेला, अपंगत्व राहिलेभारतातून पोलिओचे सन २०११ मध्ये उच्चाटन झाले असले तरी त्याआधी या आजाराने अवयवांनालुळेपणा आलेले हजारो लोक आजही तयचे परिणाम भोगत आहेत.सेंट स्टीफन्स इस्पितळातील आठ खाटांचा हा पोलिओ वॉर्ड १९८७ मध्ये सुरु करण्यात आला. तेव्हा देशात पोलिओचे प्रमाण खूप होते व हा वॉर्ड बहुतांश वेळा पूर्ण भरलेला असायचा.एकेकाळी सेंट स्टीफन्समध्ये वर्षाला ६००हून अधिक पोलिओग्रस्तांवर शस्त्रक्रिया व्हायच्या. आता ही संख्या वर्षाला २०० वर आली आहे.तरी डॉ. वर्गीज यांचे रिकाम्या वॉर्डचे स्वप्न साकार व्हायला आणखी बरीच वर्षे लागतील.

टॅग्स :docterडॉक्टरIndiaभारत