शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:14 IST

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.

नवी दिल्ली -  दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.‘गेट््सनोट्स’ या ब्लॉगवर गेट््स यांनी ज्यांच्या कामाची महती जगभर पोहोचविली ते डॉ. वर्गीज प्रथमदर्शनी तुम्हाला डॉक्टर आहेत, असे वाटणारही नाही. कारण त्यांच्याकडे स्टेथोस्कोप नसतो. उलट त्यांच्या हातातील आयुधे पाहिली तर ते सूतार असावेत असे वाटते. रुग्णाचे अवयव किती प्रतिसाद देतात हे तपासण्यासाठी त्यांच्या हातात हातोडा असतो, रुग्णाच्या हाता-पायांची लांबी मोजण्यासाठी त्यांच्या गळ््यात टेप असते व कोनाचे नेमके मोजमाप करण्यासाठी त्यांच्यापाशी ‘गॉनिनोमीटर’ हे उपकरणही असते.गेट््स यांनी केलेल्या प्रशंसेविषयी प्रतिक्रिया विचारता डॉ. वर्गीज म्हणाले, कोतुक वा टिकेने व्यक्तिश: मी करीत असलेल्या कामात काहीच फरक पडत नाही. परंतु पोलिओग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी पुढे येण्यास आणखी डॉक्टरांना व तरुणांना याने प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. डॉ. वर्गीज म्हणाले की, अवयवांत आलेले व्यंग दूर करण्यासाठी थोडीफार शस्त्रक्रिया केली व भरपूर मानसिक आधार दिला की, पोलिओग्रस्त व्यक्तीही इतर कोणाहीप्रमाणे स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते व देशाच्या विकासाला हातभार लावू शकते. त्यामुळे मी एकटा करत असलेले काम पुरेसे नाही. सरकार आणि समाजाने पोलिओग्रस्तांविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. पोलिओग्रस्तांचे पुनर्वसन हा एकच ध्यास घेऊन डॉ. वर्गीज गेली नेक वर्षे काम करत आहेत. सेंट स्टीफन्स इस्पितळातील पोलिओ वॉर्डमध्ये एकही रुग्ण न येता हा वॉर्ड पूर्णपणे रिकामा पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पोलिओमुळे हात-पाय लुळे झालेल्या असंख्य स्त्री-पुरुषांच्या दृष्टीने ते जणू देवदूत आहेत. डॉ. वर्गीज यांच्यामुळे हे लोक आज कोणाच्याही मदतीशिवाय आपापले आयुष्य जगत आहेत. हे नाते कवळ डॉक्टर व रुग्णापुरते राहिले नसून ते रुग्णांच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत.पोलिओ गेला, अपंगत्व राहिलेभारतातून पोलिओचे सन २०११ मध्ये उच्चाटन झाले असले तरी त्याआधी या आजाराने अवयवांनालुळेपणा आलेले हजारो लोक आजही तयचे परिणाम भोगत आहेत.सेंट स्टीफन्स इस्पितळातील आठ खाटांचा हा पोलिओ वॉर्ड १९८७ मध्ये सुरु करण्यात आला. तेव्हा देशात पोलिओचे प्रमाण खूप होते व हा वॉर्ड बहुतांश वेळा पूर्ण भरलेला असायचा.एकेकाळी सेंट स्टीफन्समध्ये वर्षाला ६००हून अधिक पोलिओग्रस्तांवर शस्त्रक्रिया व्हायच्या. आता ही संख्या वर्षाला २०० वर आली आहे.तरी डॉ. वर्गीज यांचे रिकाम्या वॉर्डचे स्वप्न साकार व्हायला आणखी बरीच वर्षे लागतील.

टॅग्स :docterडॉक्टरIndiaभारत