शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

फक्त ३५ रुपयांच्या ‘रिफंड’साठी तो ५ वर्षे लढला; आता रेल्वे देणार २.४३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:14 IST

३ लाख लोकांना फायदा

कोटा : राजस्थानच्या कोटा येथील एका व्यक्तीने अवघ्या ३५ रुपयांच्या रिफंडसाठी भारतीय रेल्वेशी पाच वर्षे लढा दिला आणि अखेरीस तो जिंकला. त्याच्या संघर्षाचा फायदा त्यालाच नाही तर सुमारे तीन लाख लोकांना झाला आहे. त्याच्यामुळे रेल्वे बोर्डाने २.९८ लाख वापरकर्त्यांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. 

जीएसटी लागू होण्यापूर्वीच रद्द केले होते तिकीट

पाच वर्षांच्या संघर्षादरम्यान आरटीआय कार्यकर्ते आणि व्यवसायाने अभियंता असलेल्या सुजित स्वामी (वय ३०) यांनी सुमारे ५० आरटीआय दाखल केले होते, तसेच चार सरकारी विभागांना एकामागून एक पत्रे लिहिली होती. सुजितने एप्रिल २०१७मध्ये गोल्डन टेंपल मेलचे कोटा ते नवी दिल्लीचे ७६५ रुपयांचे तिकीट बुक केले होते. तिकीट त्यावर्षी २ जुलै रोजीच्या प्रवासाचे होते. मात्र, वेटिंगमुळे ते प्रवास करू शकले नाहीत आणि तिकीट रद्द केल्यावर त्यांना ६६५ रुपये परत मिळाले. १ जुलैला जीएसटी व्यवस्था लागू होण्यापूर्वीच तिकीट रद्द करूनही रेल्वेने सेवाकर म्हणून ६५ रुपये कापण्याऐवजी ३५ रुपये जास्त म्हणजे १०० रुपये कापले होते. 

२.९८ लाख लोकांना झाला फायदा 

सुजितने ट्विटरद्वारेही पंतप्रधानांसह अन्य अधिकाऱ्यांना टॅग करुन लाखो लोकांकडून वसूल केलेला कर परत करण्याची मागणी केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून मे २०१९मध्ये आयआरसीटीसीने त्याला ३५ ऐवजी ३३ रुपये परत केले. पण, रेल्वेच्या मनमानीला बळी पडलेल्या इतर लोकांनाही परतावा मिळवून देण्यासाठी पुढील तीन वर्षे लढा सुरू ठेवला.त्यानंतर सुजित स्वामी यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रश्न पाठवून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी लढा सुरू केला.

सातत्याने आरटीआय अर्ज केल्यानंतर मिळालेल्या उत्तरानुसार, रेल्वेने २.९८ लाख लोकांकडून तिकिटे रद्द करताना प्रतिप्रवासी ३५ रुपये सेवा कर आकारला. ही माहिती समोर आल्यानंतर सुजितने आपला संघर्ष आणखी पुढे नेत रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांना रिफंडबाबत पत्रे लिहिली. अखेरीस गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्याचे फळ मिळाले. पाच वर्षांनंतर रेल्वे बोर्डाने ३५ रुपये प्रतिप्रवासी दराने २.९८ लाख ग्राहकांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला. सोमवारी आयआरसीटीसीकडून उरलेल्या २ रुपयांचा परतावादेखील मिळाल्याचे सुजित स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCourtन्यायालय