शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

फक्त ३५ रुपयांच्या ‘रिफंड’साठी तो ५ वर्षे लढला; आता रेल्वे देणार २.४३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:14 IST

३ लाख लोकांना फायदा

कोटा : राजस्थानच्या कोटा येथील एका व्यक्तीने अवघ्या ३५ रुपयांच्या रिफंडसाठी भारतीय रेल्वेशी पाच वर्षे लढा दिला आणि अखेरीस तो जिंकला. त्याच्या संघर्षाचा फायदा त्यालाच नाही तर सुमारे तीन लाख लोकांना झाला आहे. त्याच्यामुळे रेल्वे बोर्डाने २.९८ लाख वापरकर्त्यांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. 

जीएसटी लागू होण्यापूर्वीच रद्द केले होते तिकीट

पाच वर्षांच्या संघर्षादरम्यान आरटीआय कार्यकर्ते आणि व्यवसायाने अभियंता असलेल्या सुजित स्वामी (वय ३०) यांनी सुमारे ५० आरटीआय दाखल केले होते, तसेच चार सरकारी विभागांना एकामागून एक पत्रे लिहिली होती. सुजितने एप्रिल २०१७मध्ये गोल्डन टेंपल मेलचे कोटा ते नवी दिल्लीचे ७६५ रुपयांचे तिकीट बुक केले होते. तिकीट त्यावर्षी २ जुलै रोजीच्या प्रवासाचे होते. मात्र, वेटिंगमुळे ते प्रवास करू शकले नाहीत आणि तिकीट रद्द केल्यावर त्यांना ६६५ रुपये परत मिळाले. १ जुलैला जीएसटी व्यवस्था लागू होण्यापूर्वीच तिकीट रद्द करूनही रेल्वेने सेवाकर म्हणून ६५ रुपये कापण्याऐवजी ३५ रुपये जास्त म्हणजे १०० रुपये कापले होते. 

२.९८ लाख लोकांना झाला फायदा 

सुजितने ट्विटरद्वारेही पंतप्रधानांसह अन्य अधिकाऱ्यांना टॅग करुन लाखो लोकांकडून वसूल केलेला कर परत करण्याची मागणी केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून मे २०१९मध्ये आयआरसीटीसीने त्याला ३५ ऐवजी ३३ रुपये परत केले. पण, रेल्वेच्या मनमानीला बळी पडलेल्या इतर लोकांनाही परतावा मिळवून देण्यासाठी पुढील तीन वर्षे लढा सुरू ठेवला.त्यानंतर सुजित स्वामी यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रश्न पाठवून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी लढा सुरू केला.

सातत्याने आरटीआय अर्ज केल्यानंतर मिळालेल्या उत्तरानुसार, रेल्वेने २.९८ लाख लोकांकडून तिकिटे रद्द करताना प्रतिप्रवासी ३५ रुपये सेवा कर आकारला. ही माहिती समोर आल्यानंतर सुजितने आपला संघर्ष आणखी पुढे नेत रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांना रिफंडबाबत पत्रे लिहिली. अखेरीस गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्याचे फळ मिळाले. पाच वर्षांनंतर रेल्वे बोर्डाने ३५ रुपये प्रतिप्रवासी दराने २.९८ लाख ग्राहकांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला. सोमवारी आयआरसीटीसीकडून उरलेल्या २ रुपयांचा परतावादेखील मिळाल्याचे सुजित स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCourtन्यायालय